Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India vs england : भारत कसोटी जिंकणार की हरणार? या बॅट्समनने केलेली ही चूक भारताला पडू शकते महागात!

India vs england third test fourth day updatest : भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आता रोमांचक वळण आले आले आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात सारख्याच धावा केल्या त्यानंतर इंग्लंडचा संघ भारताने स्वस्तात गुंडाळला तर भारतावरही तिच नामुष्की येत आहे. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना कोण जिंकेल हा यक्ष प्रश्न आहे, तर दुसरीकडे आज चौथ्या दिवसाच्या खेळातच कोण जिंकणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण आजच सामना एक तर भारत संपवेल किंवा इंग्लड..

India vs england

भारत जिंकणार की हरणार?

लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी पकड मिळवूनही, टीम इंडियाला आता पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडने भारताला १९३ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु शेवटच्या सत्रात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने भारतीय संघाला एकामागून एक चार धक्के दिले. त्यामुळे किमान ८० धावा जरी काढल्या तरी भारत जिंकण्याच्या वाटेवर असेल असे वाटते पण तशी शक्यता इंग्लंडचे गोलंदाज धुळीस मिळवू शकतात हेही महत्वाचे आहे.

Take a Poll

भारतीय फलंदाजांची बेजबाबदार खेळी

भारताला केवळ १९३ धावांचे लक्ष आहे पण भारताने आपल्या चार विकेट्स अवघ्या ५८ धावांच्या आतच पडल्या, त्यातच केएल राहुलने शेवटच्या सत्राच्या शेवटच्या षटकात मोठी चूक केली, ज्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. केएल राहुलच्या या चुकीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. राहुलने कदाचित विचार केला नसेल की निकाल काय असू शकतो.

काय केली केएल राहुलने चूक?

खरंतर, दिवसाच्या शेवटच्या षटकात केएल राहुलकडे स्ट्राईक होता आणि त्याच्यासमोर नाईट वॉचमन आकाश दीप खेळत होता. बेन स्टोक्स हे षटक टाकत होता. स्टोक्सने पहिला चेंडू राहुलला टाकला आणि त्याने एक सिंगल घेतला आणि आकाश दीपला स्ट्राईक दिला. इथे राहुलने चूक केली. हे दिवसाची शेवटची षटक होते आणि राहुलला तिथेच उभे राहावे लागले पण त्याने आकाश दीपला स्ट्राईकवर आणून इंग्लंडचे काम सोपे केले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश दीपला बेन स्टोक्सने बाद केले, ज्यामुळे भारताला चौथा धक्का बसला. आता शेवटच्या दिवसाच्या सामन्यात भारतावर दबाव येणार आहे.

भारताला १३५ धावांची तर इंग्लंडला विजयासाठी हव्या ६ विकेट्स

आता भारताला विजयासाठी आणखी १३५ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंडला ६ विकेट घ्यायच्या आहेत. के. एल. राहुलने जी चूक केली तशीच पहिल्या डावात भारताबाबत घडली.ले ऋषभ पंतच्या बाबतीत राहुलनेही अशीच चूक केली. पहिल्या डावात तो लंचपूर्वी त्याचे शतक पूर्ण करू इच्छित होता, या दरम्यान पंतला धावण्यास सांगण्यात आले आणि भारताला धावबाद होण्याच्या स्वरूपात मोठा धक्का बसला. आता आकाश दीपच्या बाबतीत, राहुलने तसेच काहीसे केले.

भारत आणि इंग्लड स्कोअरकार्ड

इंग्लंड १९२ धावांवर आटोपल्यानंतर भारताचा डाव कोसळला, टीम इंडियाला ४ धक्के सहन करावे लागले असून इंग्लंडला १९२ धावांवर आटोपण्यात वॉशिंग्टन सुंदरने मोठी भूमिका बजावली,त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ४ बळी घेतले.आता त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले जाऊ नये.सध्या दोन्ही संघ एक विरुद्ध एक अशा बरोबरीत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+