गौतम गंभीरचे हे 5 निर्णय, ज्यामुळे भारतीय संघाला 12 वर्षांनंतर मिळालं एकदिवसीय विजेतेपद
IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून भारतीय संघाने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं आहे. याबद्दल रोहित शर्माचे खूप कौतुक होत आहे. पण गौतम गंभीरचे योगदान कमी लेखता येणार नाही. गौतम गंभीरने संघात असे अनेक बदल केले, ज्याचा निकाल सर्वांसमोर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारतीय संघात काही बदल केल्यानंतर गंभीरवर प्रश्न उपस्थित केले गेले असले तरी त्याने शांतपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले. गौतम गंभीरच्या चिकाटीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्या पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत. कोणते आहेत हे पाच निर्णय जाणून घेऊया.

संघात फिरकी गोलंदाजांना आणणे
जेव्हा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जात होता तेव्हा प्रश्न असा होता की, अष्टपैलू खेळाडूंसह पाच फिरकीपटू आणण्याची गरज होती का? बुमराहला बाहेर करण्यात आले तेव्हा वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला. त्यावेळी खूप गोष्टी बोलल्या जात होत्या पण वरुण चक्रवर्तीची निवड योग्य असल्याचे सिद्ध झाले. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणून गंभीरने त्याचा क्रिकेट अनुभव दाखवला.
ऋषभ पंतला बाहेर ठेवणे
पंत यष्टिरक्षक म्हणून खेळत होता पण त्याला बाहेर ठेवण्यात आलं आणि केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. के एल राहुलने विकेटकीपिंग सोबतच फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने शानदार कामगिरी केली. राहुलने अंतिम सामन्यातही फिनिशिंग टच देत सामने जिंकून दिले आहेत.
अक्षर पटेलचा योग्य वापर
डाव्या-उजव्या जोडीसाठी अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि ते फायदेशीरही ठरले. अक्षर पटेलने त्याच्या छोट्या आणि उपयुक्त खेळीने संघासाठी काम केले. अंतिम सामन्यात अक्षर पटेलने २९ धावांची खेळी केली.
एका वेगवान गोलंदाजाचा निर्णय
शमीला स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि हा निर्णय प्रभावी ठरला. भारताचा सामना करणाऱ्या प्रत्येक संघाला फिरकीपटूंविरुद्ध खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका वेगवान गोलंदाजाच्या आणि उर्वरित फिरकीपटूंच्या मदतीने टीम इंडियाच्या जेतेपदाच्या विजयात काम केले.
विजयी संघासह जाण्याचा निर्णय
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर संघ अंतिम फेरीपर्यंत दुबई येथेच राहील असे वाटत होते. असंचं काहीतरी पाहायला मिळालं. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आणि विजयी संघासह जाण्याचा निर्णय घेण्यात आला. बेंचवरील खेळाडू बेंचवरच बसून राहिले.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं?








Click it and Unblock the Notifications