Asia Cup 2024 Under 19 : पाकिस्तानचे भारतासमोर 282 धावांचे लक्ष्य : भारताची चौथी विकेट पडली
Asia Cup 2024 Under 19 : दुबईतील स्पोर्टस सिटी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया चषकाचा तिसरा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर शाहजेब खानने 107 चेंडूत शतक झळकावत दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक राजच्या एकाच षटकांत तीन षटकार मारले आहेत.
अंडर-19 आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारताला 282 धावांचे लक्ष्य दिले आहे. दुबईतील स्पोर्टस सिटी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने 50 षटकात 7 विकेट गमावत 281 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 23 षटकांनंतर 4 गडी गमावून 94 धावा केल्या आहेत. कर्णधार अमन 16 धावा करून, आंद्रे सिद्धार्थ 15 धावा करून आणि वैभव सूर्यवंशी 1 धावा करून बाद झाला. तर आयुष म्हात्रे 20 धावांवर सुभानने बाद झाला.
पाकिस्तानकडून सलामीवीर शाहजेब खानने 147 चेंडूत 159 धावांची शतकी खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 10 षटकार मारले. तर उस्मान खानने 94 चेंडूत 60 धावा केल्या. शाहजेब आणि उस्मान यांच्यात 160 धावांची सलामीची भागीदारी झाली.
अंडर-19 आशिया चषक 2024 च्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10:30 वाजता सामना सुरु झाला. येथे क्रिकेट चाहत्यांना दोन प्रतिभावान युवा संघांमधील खडतर सामना पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या लढतीसाठी स्टेज तयार होत असताना, मोहम्मद अमानच्या नेतृत्वाखालील भारत अंडर-19 त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय संघात प्रतिभावान खेळाडू
भारतीय संघात आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आणि सी आंद्रे सिद्धार्थ या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे, साद बेगच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान अंडर-19 संघ अडचणींवर मात करून विजय मिळवण्याचा निर्धार करेल. मोहम्मद अहमद, हारून अर्शद आणि तैयब आरिफ या प्रमुख खेळाडूंसह पाकिस्तानी संघ आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवू शकतो. दुबई स्टेडियम खेळपट्टी अहवाल दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी बॅट आणि चेंडू दोन्हीसाठी अनुकूल आहे.
खेळपट्टी आधी वेगवान नंतर फिरकीसाठी अनुकूल
वेगवान गोलंदाज नवीन चेंडूसह उपलब्ध असलेल्या सुरुवातीच्या स्विंगचा फायदा घेऊ शकतात, परंतु खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटूसाठी खेळपट्टी पोषक असेल, अशी अपेक्षा आहे, कारण खेळपट्टी त्यांना वळणासाठी मदत करू लागल्याने त्यांना फायदा होईल. फलंदाजांना सुरुवातीला हे सोपे वाटू शकते परंतु नंतरच्या टप्प्यात त्यांना फिरकीविरुद्ध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
भारत U19 संघ: हार्दिक राज, वैभव सूर्यवंशी, प्रणव पंत, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (विकेटकीपर), मोहम्मद अमन (कर्णधार), आयुष म्हात्रे, समर्थ नागराज, निखिल कुमार, युधाजित गुहा, चेतन शर्मा, किरण चोरमले, अनुराग कवाडे, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद अनॉन.












Click it and Unblock the Notifications