वक्फ विधेयकावरुन मविआत बिघाडी, ठाकरेंनी घेतली वेगळी भूमिका; राणे म्हणाले- व्यत्यय आणणे त्यांचे काम
Uddhav Thackeray on Waqf Bill : दोन दिवस वादळी आणि प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर अखेरी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाली. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.
दरम्यान, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.

आप, कॉंग्रेस व एमआयएमची कोर्टात धाव?
वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स (APCR) या स्वयंसेवी संस्थेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
याआधी काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात जाणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
वक्फ कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसला कोर्टात जायचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जशी वेळ येईल, तेव्हा याबाबत बोलत राहीन.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेतील, हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तसंच आमची भूमिका आम्ही मांडली आहे. लोकांना तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचं हे यांचे धोरण आहे, असा निशाणा त्यांनी भाजपवर लगावला.
चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम- नारायण राणे
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास, समृद्धी, लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले शिवसेना संपली, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक












Click it and Unblock the Notifications