आझाद मैदानात आपले बांधव, कसलीही कमी पडू देऊ नका; उद्धव ठाकरेंचे मोठे आदेश
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट फोनवरून पाठिंबा दिला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संवाद घडवून आणला. दीड ते दोन मिनिटे चाललेल्या या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

नेमकं काय घडलं?
अंबादास दानवे यांनी आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मराठा आरक्षणासह मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या सोयी-सुविधांबाबत चर्चा सुरू होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा फोन आला. दानवे यांनी तातडीने जरांगे पाटील आणि ठाकरे यांच्यात फोनवर संवाद घडवून आणला. या भेटीनंतर बोलताना दानवे म्हणाले, "दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही, ते मनोज जरांगेच सांगू शकतील."
या फोन कॉलमध्ये मराठा समाजाच्या मागण्या आणि मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या व्यवस्थापनावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या सूचना
उद्धव ठाकरे यांनी केवळ फोनवर बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी मुंबईतील आपल्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सरकार आंदोलकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात कमी पडले असल्याचा आरोप करत, ठाकरेंनी शिवसैनिकांना आंदोलकांसाठी पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आरक्षणासाठी संघर्ष करत मुंबईत एकवटले आहेत. अशा वेळी शिवसैनिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे.
सरकारमध्ये तीन गट असल्याचा संजय राऊतांचा आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करताना, 'सरकारमध्ये तीन गट आहेत आणि शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहे, कारण त्यांचा उद्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा आहे,' असा गंभीर आरोप केला आहे.
जरांगेंकडून शिंदेंचे कौतुक
या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनीच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले होते. "एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो," असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळे, आता राज ठाकरे यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications