उद्धव आणि राज ठाकरेंचं भाषण किती वाजता? 'या' दिग्गजांची भाषणं होणार; जाणून घ्या A To Z माहिती
आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज (५ जुलै २०२५) होणारा "विजयी मेळावा" या ऐतिहासिक मिलाफाचा साक्षीदार ठरणार आहे. राज्यातच नव्हे, तर दिल्लीपर्यंत या मेळाव्याकडे अत्यंत औत्सुक्याने पाहिले जात आहे.

या मेळाव्याची पार्श्वभूमी ठरली ती सरकारकडून शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित लढ्याची. दोघांनीही या मुद्द्यावर एकत्र येत सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारले आणि अखेर शासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. या यशानंतर, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारा हा विजयी मेळावा केवळ जल्लोषापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यातून पुढील राजकीय दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या व्यासपीठावरून होणाऱ्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे हे शेवटचे वक्ते असतील. याशिवाय, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रकाश रेड्डी आणि राज ठाकरे यांची भाषणे होणार आहेत. उपस्थिती लावणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही बोलण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन हाजी अलीपासून वरळी दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोमबाहेर मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून, हजारो समर्थक बाहेरूनच कार्यक्रम पाहतील.
हा मेळावा फक्त आंदोलनाच्या यशाचा उत्सव नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन पुढेही राजकीय समन्वय ठेवणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे. आगामी मुंबई महापालिका आणि अन्य महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एकत्रीकरण केवळ भाषिक अस्मिता जोपासण्यासाठी आहे की राजकीय युतीचा प्रारंभ आहे, याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांनी "जय गुजरात" दिलेल्या घोषणेमुळे आणि सुशील केडिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या वातावरण अधिकच तापलेले आहे. अशा स्थितीत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भाषणांतून या मुद्द्यांना कोणत्या प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आजचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. हा फक्त भाषिक अस्मितेचा विजय नोंदवणारा मेळावा नाही, तर एक संभाव्य राजकीय वळण देणारा निर्णायक क्षण असू शकतो. ठाकरे बंधूंनी दिलेल्या संकेतांनुसार पुढे महत्त्वाचे राजकीय समीकरण जुळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications