Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांनी वाटोळं केलं म्हणत सुप्रिया सुळेंविरोधात जमाव आक्रमक, मैदानावर तणाव

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जरांगे यांची भेट घेतली. भेटीनंतर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. आंदोलकांनी सुळे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

supriya sule protests maratha anger sharad pawar azad maidan

नेमकी काय घडले आझाद मैदानावर?

सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या गाडीकडे परत जात असताना काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही संतप्त आंदोलकांनी शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकाराने तणाव वाढला, मात्र काही आंदोलकांनी शांत राहून सुप्रिया सुळे यांना त्यांच्या गाडीपर्यंत वाट काढून दिली.

सुळे त्यांच्या गाडीत बसल्यानंतरही आंदोलकांनी त्यांचा पाठलाग करत गाडीला घेराव घातला. तरीही सुप्रिया सुळे यांनी संयम राखत प्रत्येक आंदोलकाकडे पाहून हसतमुखाने नमस्कार केला. या घटनेनंतर एका बाजूला मराठा समाजामध्ये सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली, तर दुसऱ्या बाजूला काही आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे आंदोलनाची प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा सुरू झाली.

जरांगे यांचे वारंवार शांततेचे आवाहन

या प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना शांत राहण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 'आपल्याला शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवायचे आहे,' असे ते सातत्याने सांगत आहेत. मात्र, काही आंदोलकांचा वाढता संताप आणि आक्रमकता यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजकीय प्रतिक्रिया आणि सध्याची परिस्थिती

आझाद मैदानावर घडलेल्या या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवण्याचे आवाहन केले आहे, तर सत्ताधाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मराठा आंदोलकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे मुंबईतील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे, ज्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांना अडवले जात आहे.

मनोज जरांगे यांनी 'पाण्याचा थेंबही घेणार नाही' असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर सरकारवरचा दबाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत, पण जरांगे यांनी फक्त चर्चेला न थांबता ठोस निर्णयाची मागणी केली आहे. त्यामुळे, आगामी काळात सरकार कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+