Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फडणवीसांमुळे अजितदादांनी शरद पवारांविरुद्ध बंड केले का?, सुप्रिया सुळेंनी केला मोठा खुलासा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे महायुतीत सामाली होण्यामागील नेमकं कारण काय याबाबत मोठा खुलासा केला आहे. सुप्रिया सुळे यांनी कोणत्या कारणामुळे त्यांचे चुलत भाऊ अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून भाजपशी हातमिळवणी केली, याबाबत मोठा दावा केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजित पवार काका शरद पवार यांना सोडून गेले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जात आहे. अजित पवारांनी शरद पवारांना सोडून दिल्याने आता सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीला थेट फडणवीसच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

Supriya Sule

फडणवीसांची फाईल दाखवून अजित पवारांना धमकी

फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे काही कागदपत्रांची फाईल घेऊन त्यांना धमकावल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे अजित पवार यांच्यावर महायुतीत सहभागी होण्याची वेळ आली.

एका मराठी वृत्तवाहिणीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांना महायुतीशी युती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी धमकावले गेले अजित पवार गटातील अनेक नेते राष्ट्रवादी-सपामध्ये येण्यास इच्छुक आहेत, पण ज्यांनी आमच्या वाईट काळात साथ दिली, त्यांचा विश्वासघात करू इच्छित नाही, असा दावा देखील त्यांनी केला.

बारामतीत काका-पुतण्यात संघर्ष

शरद पवार यांचा दीर्घकाळ संबंध असलेल्या बारामतीत पवार कुटुंबातील काका-पुतणे रणांगणात आमनेसामने आहेत. बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. या कौटुंबिक लढाईवर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो, बारामतीची जागा नेहमीच शरद पवारांची राहिली आहे आणि यंदाच्या निवडणुकीत जनता अजित पवारांचा नाही तर शरद पवारांचाच विचार करेल, असा विश्वास मला आहे.

जून 2022 मध्ये राष्ट्रवादीत फूट

अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर ही घोषणा झाली, ज्यामुळे पक्ष आणि पवार कुटुंबामध्ये मोठी फूट पडली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार गटाला निवडणुकीत यश मिळाले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जनता राजकीय पक्षांना बेकायदेशीरपणे तोडलेले आणि अन्यायकारकपणे जनतेवर लादलेले पक्ष म्हणून पाहते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+