सुनेत्रा अजित पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पडद्यामागची ताकद आता सत्तेत!
Sunetra Pawar Becomes Maharashtra's First Woman Deputy CM : 31 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली जबाबदारी स्वीकारत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आजवर अजितदादांच्या राजकीय प्रवासात पडद्यामागची शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वहिनी' आता थेट राज्याच्या सत्तेची सूत्रे सांभाळणार आहेत.
आधी विधिमंडळ नेतेपदी निवड!
सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तिथे दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला.

राजकीय वारसा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेर येथील एका प्रतिष्ठित राजकीय घराण्यात झाला.
- माहेरचा वारसा : त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक आणि स्थानिक नेते होते. त्यांचे बंधू पदमसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरूनच मिळाले होते.
- सासरची साथ : 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. गेल्या चार दशकांपासून त्या पवार कुटुंबाच्या सून म्हणून बारामतीच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात एकरूप झाल्या आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Sunetra Pawar, leader of the NCP legislative party and wife of late Deputy CM Ajit Pawar, takes oath as Deputy CM of Maharashtra at the Lok Bhavan
— ANI (@ANI) January 31, 2026
Maharashtra CM Devendra Fadnavis, Deputy CM Eknath Shinde and other leaders present. pic.twitter.com/qL8IIvNeoR
सामाजिक कारकीर्द : 'ग्रीन वॉरियर' ते 'वहिनी'
सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी समाजकारण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले:
एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) : २०१० मध्ये त्यांनी या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय शेती, जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणासाठी मोठे काम केले.
इको-व्हिलेज संकल्पना : बारामतीजवळील काटेवाडी गावाला त्यांनी देशातील पहिले 'इको-व्हिलेज' म्हणून विकसित केले. स्वच्छता, सौर ऊर्जा आणि सांडपाणी व्यवस्थापनात हे गाव आज आदर्श मानले जाते.
शैक्षणिक योगदान : त्या 'विद्या प्रतिष्ठान' या नामवंत शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त असून २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहेत.
महिला सक्षमीकरण : बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आदरणीय अजितदादांच्या अकाली निधनाने आपल्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादांनी ज्या निष्ठेने आणि वेगाने महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकला, तोच वारसा पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधीमंडळ गटनेते पदी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची निवड करण्यात आली आहे.… pic.twitter.com/TjyokwDfHb
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 31, 2026
राजकीय प्रवास: पडद्यामागून थेट मैदानात
सुनेत्रा पवारांचा सक्रिय राजकीय प्रवास तसा अलीकडचा आहे:
- २०१९ लोकसभा: पुत्र पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्या पहिल्यांदा अधिक सक्रियपणे मैदानात उतरल्या.
- २०२४ लोकसभा: बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपली पहिली निवडणूक नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही, पण त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.
- राज्यसभा खासदार: पराभवानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेवर पाठवले.
- उपमुख्यमंत्रिपद (२०२६): अजितदादांच्या निधनानंतर पक्षाला सावरण्यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.
आगामी आव्हाने
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत:
अजितदादांचा वारसा : दादांनी उभा केलेला गट आणि कार्यकर्ते यांना एकत्र ठेवणे.
विधानसभा निवडणूक : पुढील सहा महिन्यांत त्यांना विधानमंडळावर निवडून यावे लागेल, कदाचित त्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवू शकतात.
राष्ट्रवादीची एकी : शरद पवार गटासोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल.












Click it and Unblock the Notifications