...म्हणून या वायरमनचं सोशल मिडीयावर होतय कौतूक, पाहा व्हिडीओ
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.वारं किंवा थोडा ही पाऊस आला की वीजपुरवठा खंडीत झाली म्हणूनच समजा. त्यावेळी महावितरण कार्यालयात फोन येईला सुरुवात होते. मात्र नागरिक अशावेळी वीजपुरवठा सुरु होईल अशी आशाच सोडून देतात.

दिवसाढवळ्या ही पाऊस आणि वारं यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो.मात्र मध्यरात्री काही वीज पुरवठा खंडीत झाला तरी महावितरण कार्यालय आणि वायरमनकडून काही प्रतिसाद मिळत नाही, असा अनुभव आपल्या मिळाला असेल मात्र नाशिक जिल्हात एक आश्चर्य करणारी घटना समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वायरमने अंगावर रेनकोट परिधान केलेला दिसतोय. हातात बॅटरी घेऊन वायमनने कंबरे इतक्या पाण्यातून वाट काढून वीज खांबावर चढला आणि गावातील विजपुरवठा सुरळीत केला आहे. त्याच्या कामाचे सध्या सोशल मिडीयावर जोरदार कौतूक होत आहे.सिद्धू आंधळे अंस वीज कर्मचाऱ्याने नाव आहे.आपल्या जीवाची पर्वा न करता वायरमनने केलेल्या कामाची जोरदार चर्चा सुरु आहे.
मध्यरात्री 3 वाजता भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा केला सुरळीत#Mseb pic.twitter.com/hcVMsr0DMh
— jitendra (@jitendrazavar) July 12, 2024
पावसाळ्याच्या दिवसात वारं किंवा थोडा ही पाऊस आला की वीजपुरवठा खंडीत झाली म्हणूनच समजा. त्यावेळी महावितरण कार्यालयात फोन येईला सुरुवात होते. मात्र नागरिक अशावेळी वीजपुरवठा सुरु होईल अशी आशाच सोडून देतात.पण सिध्दू आंधळे सारख्या जिगरबाज वायरमनकडून इतर कर्मचा-यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications