विधानसभेसाठी शरद पवार सरसावले; नेमकी काय रणनीती?
मुंबई : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलाच फटका बसला, तर महाविकास आघाडीला मात्र चांगले यश मिळाले.

मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाच्या जोरावर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या, तर काँग्रेस समर्थक विशाल पाटील हे देखील सांगलीतून खासदार झाले.
आता मविआचे प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले कसून विधानसभेसाठी रणनीती आखत आहेत. खरंतर आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की," आता आपलं विधानसभा हे एकमेव लक्ष्य आहे."
महाविकास आघाडी म्हणून लढणार:
उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हे आपले लक्ष्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे" असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार हे मात्र स्पष्ट झालं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने मविआला चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे सुद्धा सोबत होते. त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. असं देखील पवार यांनी म्हटलं आहे. तीन महिने हातामध्ये आहेत. दोन अडीच महिने मिळतील, त्याचा लाभा घ्यावा हा आमचा प्रयत्न आहे" असं शरद पवार म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीने सगळ्यांना जमिनीवर आणलं, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'माझे पाय जमिनीवर आहेत' मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे ठेऊन निवडणूक लढवावी असं संजय राऊत म्हणतात, त्यावर 'आम्ही तिघे एकत्र आहेत. आमचा सामूहिक चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेऊ इच्छितो' असं उत्तर त्यांनी दिलं.
जागावाटप कधी ठरणार?
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा जोर धरू लागली आहे. जुलैच्या सुरुवातीला हे जागावाटप अंतिम करण्याचा प्रयत्न असल्याचं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
भारतीय संघाचे अभिनंदन:
सरतेशेवटी पवार यांनी भारतीय संघाने काल जिंकलेल्या T20 विश्वचषक सपर्धेबाबत शुभेच्छा दिल्या. कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भूत चमत्कार केला. चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, या सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला. आपण टी 20 वर्ल्ड कप विजयासाठी 100 टक्के खेळाडूच कौतुक केलं पाहिजे. उत्तम कोच मिळाला, द्रविडने योग्य मार्गदर्शन केलं, आत्मविश्वास वाढेल असा सल्ला दिला. त्याचाच परिणाम सामुदायिक यशामध्ये झाला" असं शरद पवार म्हणाले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications