शरद पवारांचा अजित पवारांना टोला, मात्र फडणवीसांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटांमध्ये सध्या जवळ येण्याच्या चर्चांना जरी उधाण आले असले तरी, शरद पवारांनी नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं की, ते ना अजित पवारांच्या गटासोबत, ना भाजपच्या वाटेवर जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या भूमिकेचं स्पष्टपणे समर्थन केलं. मालेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी घेतलेल्या पवित्र्यावर अप्रत्यक्ष टीका करत, पवार म्हणाले, "लोकांना बरोबर घेण्याची वृत्ती दाखवली असती, तर आजची स्थिती टाळता आली असती. पण, जे झालं ते झालं, आता पुढे पाहायचं."
"माझं नाव असलेला कारखाना, पण आमचा टोकाचा हस्तक्षेप नव्हता"
शरद पवारांनी स्पष्ट केलं की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपली टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती, आणि अजूनही ती नाही. या साखर कारखान्याशी त्यांचं नाव जोडलेलं असलं, तरीही कारखाना हा स्थानिक प्रश्न असून, आसपासच्या तालुक्यांच्या दृष्टिकोनातून त्याला फारसं महत्त्व नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
"हा सध्या फक्त १९ हजार सभासदांपर्यंत मर्यादित प्रश्न आहे. दीर्घकालीन नाही. परिस्थिती थोडी वेगळी होती. पण आम्ही ताणलं नाही," असं सांगत त्यांनी चंद्रराव तावरे यांच्याशी संबंधित संदर्भही मांडला. काही अडचणींच्या पार्श्वभूमीवर, संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी भूमिका मवाळ ठेवली, असंही ते म्हणाले.
AIसंदर्भातील निर्णयाबद्दल शरद पवारांनी फडणवीसांचे केले कौतुक
राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासंदर्भातील निर्णयाचं शरद पवारांनी विशेष स्वागत केलं. त्यांच्या मते, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
"महाराष्ट्र सरकारने 500 कोटींचा निर्णय घेतला, जो ऊस आणि इतर पिकांमध्ये AI चा वापर करण्याबाबत होता. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. त्यांनी पुढाकार घेतला, हे धाडसाचं पाऊल आहे. संपूर्ण देशात हे पहिले राज्य आहे, जे शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारत आहे," असं मत शरद पवारांनी मांडलं. त्यांनी यासंदर्भातील वर्कशॉप्स आणि धोरणात्मक नियोजनात आपलं लक्ष असल्याचंही अधोरेखित केलं.
संपूर्ण घडामोडींचा विचार करता, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकीवर सध्या तरी पडदा पडल्याचं स्पष्ट होत आहे. शरद पवारांनी परस्पर संबंधांना स्पष्टपणे दूर ठेवलं असून, साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने, दोघांमधील विचारविभाजन अधिक ठळकपणे समोर आलं आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications