राजकीय वर्तुळात खळबळ; सप्टेंबरनंतर राज्यात मोठी उलथापालथ? कोणी केला हा मोठा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी आणि मंत्र्यांच्या खातेबदलाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटून सध्याच्या मित्रपक्षांसोबत काम करणे अवघड झाल्याचे सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. 'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा', असे सूचक विधान करत लवकरच काहीतरी मोठा राजकीय बदल घडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

'सरकार कलंकित झाले आहे, मंत्र्याला जावेच लागेल'
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "हे सरकार पूर्णपणे कलंकित झाले आहे. वसईच्या आयुक्तांवर पडलेली धाड 1000 कोटी रुपयांचे प्रकरण आहे आणि या प्रकरणात एका मंत्र्याला निश्चितच जावे लागेल." नुकताच खातेबदल झालेल्या क्रीडामंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला. "नव्या क्रीडामंत्र्यांना योग्य खाते मिळाले आहे, पण त्यांनाही जावे लागेल. ही व्यवस्था तात्पुरती सुरू आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो," असा टोला त्यांनी लगावला.
'फडणवीसांना हे ओझे फेकून द्यायचे आहे'
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दल माहिती मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला. ते म्हणाले, "मंत्र्यांचा खातेबदल ही केवळ थातूरमातूर कारवाई आहे. आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत." पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या सगळ्याचे ओझे झाले आहे. त्यांनाही हे ओझे उचलून फेकून द्यायचे आहे."
'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा...'
राऊत यांच्या दाव्यानुसार, फडणवीस यांनी अमित शहांना सांगितले आहे की, "अशा लोकांमुळे सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे आणि आता काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल." 'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, काय होते ते तुम्हाला समजेलच,' असे सूचक विधान करून राऊत यांनी आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications