संजय राऊत म्हणतात अमित शहा, पीएम नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की भिती वाटते..! काय आहे कारण वाचा
Sanjay Raut on Narendra Modi Amit Shah : "घटनाबाह्य सरकार त्यांनी या राज्यात पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बसवले त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येतात. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की, आम्हाला भिती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातील एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भुखंड अदानींच्या घशात जाईल याची भिती वाटते आणि हे लोक त्याची तयारी करायला महाराष्ट्रात येतात." असं क्तव्य शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
गृहमंत्र्यांनी काश्मिरात जायला हवं
संजय राऊत म्हणाले, देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहे हे दिसतच आहे. त्यांनी मणीपूर, काश्मिरात जाऊन थांबायला हवे. तिथे हल्ले होत आहेत. चीनचे सैन्य लडाखमध्ये घुसत आहे तिथं जायला हवं. पण त्यांना महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची वाटते, म्हणून ते येथे येत आहेत.

अदानींच्या घशात भुखंड घालतील
संजय राऊत म्हणाले, घटनाबाह्य सरकार त्यांनी या राज्यात बसवले त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येतात. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की, आम्हाला भिती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातील एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भुखंड अदानींच्या घशात जाईल त्याची तयारी करायला काही लोक येत आहेत. म्हणजेच अमित शहा येत आहेत.
अदानींना काल दोनशे एकर जमीन देण्याचा निर्णय
काल दोनशे एकर जमीन अदानींना द्यायचा निर्णय झाला. त्या जमीनीचे मोजमाप करायला येतात का..हे लक्षात घेता आम्हाला भाजपचे नेते येथे आले की, भिती वाटते. कारण महाराष्ट्राच्या फुटीसंदर्भात ते काहीतरी निर्णय घेत असतात. देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम करायला हवं,याबाबत संविधानात काही नियम असतात. ते सर्व बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत असले प्रकार करतात आणि विरोधकांवर हल्ले हेच त्यांचे काम राहीले आहे. सरकार पटेल जे देशाचे गृहमंत्री होते ते काय करत होते याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी.
संजय राऊत म्हणाले, व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात कुणी आधी केला नाही पण अमित शहा नेमकं तेच करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील असे वाटते.
याचा अर्थ आहे की, लोकांचं मत त्यांच्या विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच मेट्रोचे उद्घाटन त्यांनी सहा वेळा केलंय. पुण्यात त्यांच्या चकरा वाढल्या हे लक्षात घ्या असंही ते म्हणाले.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications