Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शस्त्रपूजन केलं, शपथ घेतली अन् कोमकरला संपवलं; बदला घेण्याचा प्लॅन कसा केला?

पुण्यात टोळीयुद्धाचा भडका! नाना पेठेत नातवाचा गोळ्या घालून खून; 'वनराज'च्या अंत्यविधीवेळी घेतलेल्या शपथेची चर्चा
एकिकडे, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असताना, दुसरीकडे नाना पेठेत टोळीयुद्धाच्या रक्तरंजित घटनेने खळबळ उडवून दिली आहे. गेल्या वर्षी खून झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याच्या 20 वर्षीय मुलाचा, आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

pune gang war andekar komkar murder

नेमका प्रकार काय घडला?

शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली. आयुष कोमकर, जो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता, तो आपल्या मित्रासह कॉम्प्लेक्सच्या गेटवर उभा होता. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर तिथे पोहोचले. त्यांनी थेट आयुषवर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्रही जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.

हा खून गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने पुण्याच्या मध्यवर्ती भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टोळीयुद्धाची पार्श्वभूमी आणि बदल्याची शपथ

आयुष कोमकरच्या खुनाचे थेट संबंध गेल्या वर्षीच्या टोळीयुद्धाशी जोडले जात आहेत. गेल्या वर्षी, 1 सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीचा आधारस्तंभ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा डोके तालीम परिसरात कोयत्याने आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात गणेश कोमकर, सोम्या गायकवाड आणि इतर आरोपी आहेत. गणेश कोमकरची पत्नी ही कुख्यात बंडू आंदेकरची मुलगी आहे आणि ती स्वतः वनराजच्या खून प्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे, आंदेकर-कोमकर कुटुंबीयांचे संबंध आधीच ताणले गेले होते.

वनराजच्या खुनानंतर त्याच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी मोठी शपथ घेतली होती. त्यांनी शस्त्रपूजन करून जाहीरपणे वनराजच्या खुनाचा बदला घेण्याचे वचन दिले होते. याची माहिती पुणे पोलिसांना आणि गुन्हे शाखेलाही होती. यामुळेच पोलिसांनी भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता गृहीत धरली होती.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही दिवसांपूर्वी एक मोठा कट उधळण्यात आला होता. भारती विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीने एका खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती आणि 5 पिस्तूलांपैकी 2 जप्त केली होती. मात्र, नाना पेठेतील हा कट पोलीस उधळू शकले नाहीत.

शहरात कडेकोट बंदोबस्त असतानाही भर गर्दीत हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखेची सहा पथके आरोपींचा शोध घेत असून, लवकरच आरोपींना पकडण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+