आतापर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील: मनोज जरांगे
Mumbai: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत राहीलेला जालना जिल्हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. यावेळी कारण मराठा आरक्षणाच नाही तर ओबीसी आरक्षणाच आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळं अवघ्या राज्याच लक्ष पुन्हा एकदा जालना जिल्ह्याकडे लागलं आहे.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (२१ जून) त्यांना रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं.

जरांगे म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने गेली 15-20 वर्षे आम्हाला फसवले, आता तुमच्याबाबतही तेच होईल. आजपर्यंत सरकार आम्हाला पाणी पाजत होते, आता ते तुम्हालाही पाणी पाजतील, असं विधान जरांगेंनी केलं आहे. तसेच आम्ही आंदोलन केलं तर जातीय तेढ आणि ओबीसींनी केलं तर शांतता अशी टीकाही त्यांनी केली आहे.
ओबीसींचे आंदोलन सरकार पुरस्कृत
पुढे बोलताना ते म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. ते म्हणाले, ''आम्ही आंदोलन केलं तर जातीय तेढ नाव दिला जातो, ओबीसींनी केलं तर शांतता असे म्हंटले जाते. शेवटी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्यावर असेच होते. मराठा समाजावर नेहमीच अन्याय केला जातो'', असेही ते म्हणाले.
आंदोलन म्हटल्यावर शिष्टमंडळ येणारच
सरकारच्या शिष्ठमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावर जरांगे म्हणाले, ''आंदोलन करतायत म्हटल्यावर सरकारी शिष्टमंडळ येणारच. आंदोलन केल्यावर त्यांना यावे लागणारच. पण दोघांचीही सारखीच फजिती होणार, हे ध्यानात ठेवा.
सरकारने 15-20 वर्षे आम्हाला फसवले. आजपर्यंत ते आम्हाला पाणी पाजत होते, आता तुम्हाला पाणी पाजतील'', असा सावधनातेचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हाकेंना दिला.
ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका
जरांगे म्हणाले, ''25 वर्षे मराठा समाजाची फसवणूक केली. कितीही फसवले तरी मी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देणार. गोड बोलून आम्हाला फसवले जात असेल तर आता त्यांना आम्ही डुबवणारच'', असंही मनोज जरांगे यांनी म्हटलय. तसेच ''ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका. ओबीसी आंदोलक आपले विरोधक नाहीत, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार
चार महिन्यांनी काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आम्ही आता रडत बसणार नाही. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मुख्य मागणी आहे. आता आंदोलन करणार नाही येत्या निवडणुकीत 288 उभे करु किंवा 288 जणांना पाडू'' असंही जरांगे म्हणाले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications