मेलो तरी मागे हटणार नाही! मराठ्यांना आरक्षण मिळवून देईलच, 20 जूलैपासून पुन्हा उपोषण - जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर - सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी विचार करावा, अन्यथा येत्या 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करेल. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढली. आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौकात मनोज जरांगे यांची रॅली पोहचली असून त्यांना मोठा हार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला आहे. यानंतर त्यांनी रॅलीतील मराठा समाजबांधवांना संबोधित केले.

सरकारच्या हातात आजची रात्र
जरांगे पाटील म्हणाले, कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही. काहीही झाले तरी मराठे न्याय देणारच. देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीवाल्यांनो आता पडणार की नाही सरकार अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षाला आव्हान दिले. त्यांना आपल्या वेदना कळणार नाही. आज एक महिना झाला सरकारने वेळ मागितला होता. आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा समाजाच्या आंदोलकांवरील केसेस मागे घ्याव्या. आमच्या एकूण नऊ मागण्या आहे.
288 उमेदवार पाडणार
जरांगे पाटील म्हणाले, 288 उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जाहीर सांगतो की, आमच्या नऊ मागण्या पूर्ण करा. राज्यात एकूण पाच टप्पे आहेत. आज पहिल्या टप्प्याचा समारोप आहे. मी अन्न-पाण्याचा विचार केला नाही. आम्ही कट्टर आहोत. सरकारने छगन भुजबळांच्या नादी लागू नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सांगतो की, मराठे मुंबईपर्यंत पोहचू शकतात.
ओबीसीतून आरक्षण द्या
जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे, समाजाने शांत राहावे, मी समाजाचा मुलगा आहे. सरकारच्या हातात आज रात्र आहे , त्यामुळे सरकारने विचार करावा. मला राजकारणात जायचे नाही पण आमचा आग्रह एवढाच आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणे देणे नाही. जर आज रात्रीतून आरक्षण नाही दिले तर मी 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करतोय. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईला स्वारी, तारीख घोषित करणार
जरांगे पाटील म्हणाले, उपोषण सुरु झाल्यानंतर मुंबईची तारीख कधी घोषित करायची मुंबईला कधी जायचे हे आपण ठरवू. 288 उमेदवार पाडायचे की, उभे करायचे हे मी ठरवणार आहे. समाजाचा रक्त पिणारी पैदास माझी नाही. सरकार आपल्यावर डाव टाकत आहेत, त्यामुळे मला आणखी डाव टाकू द्या असे समाजाला त्यांनी आवाहन केले.
जालना रस्ता बंद
आज सकाळी 11 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड बंद करण्यात आला आहे. तसेच या रॅलीमुळे कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका







Click it and Unblock the Notifications