पराभवाची कारणे सांगत खर्गेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धो-धो धूतलं; राहुल गांधींसमोरच म्हणाले...
Congress executive meeting- हरियाणा आणि आता महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. लोकसभेला केलेली कामगिरी, या दोन्ही राज्यातील विधानसभेत कायम ठेवता आली नाही. याच पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यात त्यांनी या दोन्ही राज्यातील नेत्यांना चांगलेच सुनावले.

आपणच आपला पराभव केला
या बैठकीमध्ये बोलताना खर्गे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर तीन राज्यांतील विधासभेत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडिया आघाडीनं चारपैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं. मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. मी पुन्हा- पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद. एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंटमुळे पक्षाचं मोठं नुकसान होतय. हे वेळीच थांबवलं गेलं नाही, तर याचा मोठा फटका बसेल, अशा शब्दात खर्गे यांनी नेत्यांना खडसावले.
राहुल गांधींचीही उपस्थिती
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा जिंकल्या होत्या. राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेसचंदमदार पुनरागमन केलं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला केवळ 16 जागाच जिंकता आल्या. या दोन्ही पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पराभवाचं कारण सांगितलं. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांची देखील उपस्थिती होती.
राज्यातील मुद्यांकडे देणार लक्ष
या बैठकीत आगामी काळात काय करायचंय, याचीही चर्चा झाली. खर्गे म्हणाले, ज्या राज्यात आपला पराभव झाला, तिथे आपली संघटना मजबूत नव्हती असं म्हणावं लागेल. आपल्याला त्या राज्यातील संघटना अजून मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार आहे. सोबतच त्या -त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल, असंही खर्गे यांनी स्पष्ट केलं.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications