Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

70 दिवसांत पावसामुळे राज्यात 97 जणांचा मृत्यू! 24 तासांत राज्यात काय काय घडलं! जाणून घ्या

मुंबई - पावसाने मुंबईसह आता राज्यात जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर बाब म्हणजे १५ मे ते आजपर्यंत सत्तर दिवसांत ९७ जणांचा मृत्यू झाला असून १३२ जण जखमी झाले आहेत.

या चोवीस तासात राज्यात पावसामुळे काय काय घडलं हे जाणून घेऊया.

Maharashtra Weather 97 people died due to rain in seventy days

या आहे अपडेट्स

  • भारतीय हवामान विभागाकडून काल राज्यातील (पालघर, रायगड, पुणे, सातारा) या (04) जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर जोरदार पाऊस झाला.
  • आज पुढील 3 तासात राज्यातील ठाणे, रायगड, सातारा, पुणे, मुंबई, मुंबई शहर या 6 जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
  • पालघर, अहमदनगर, रामागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट
  • गेल्या 24 तासात मुंबई आणि मुंबई उपनगर वगाहून राज्याचे सरासरी पर्जन्यमान 33.7 मिमी
  • मुंबई व मुंबई उपनगर येथे अनुक्रमे 62.5 मिमी व 86.1 मिमी पाऊस
  • महाराष्ट्रात 1 जून ते आजपर्यंत 619 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे.
  • 15 मे ते आजपर्यंत 97 लोकांचा मृत्यू, 132 लोक जखमी
  • महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 24 तासात 4 व्यक्तींचा मृत्यू, 1 व्यक्ती जखमी
  • पुण्यामध्ये न्होपात्रात वाढ झाल्याने अंडा भुर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून 3 व्यक्ती मृत्युमुखी
  • मौजे आदरवाडी, तालुका मुळशी येथे। व्यक्ती दरड कोसल्यामुळे मृत्युमुखी
  • लवासा येथे एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोणीही अडकल्या असल्याची माहिती अद्याप अप्राप्त. शोध बचावासाठी पाठक रवाना करण्यात आले आहेत.
  • सुरक्षित स्थळी स्थलांतरी केलेल्या नागरिकांची सांख्या तपशील (जिल्हा) पुणे व कोल्हापूर जिल्यांमध्ये सखल भागत पाणी साचल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
  • जल संपदा विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या अहवालानुसार राज्यातील सर्व धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा 52.1% इतका आहे.
  • कुंडलिका (रायगड), आंबा (रायगड), सावित्री (रायगड), जगबुडी (रत्नागिरी) नद्यांची धोका पातळीच्या वर वाहत आहे.
  • पाताळगंगा (रायगड) व पंचगंगा (कोल्हापूर) इशारा पातळी वर चाहत आहे.

दरड कोसळली, उपाययोजना सुरु

पुणे जवळील लवासा व ताम्हिनी येथे दरड कोसळली. उद्भवलेल्या या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना आवश्यक सुविधा भोजन व निवास याबाबतची व्यवस्था करण्याच्या सुचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगरात जोरदार पाऊस येथील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्याबाबतचे निर्देश वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात विसर्गाचा परिणाम

धरणाचा साठा 75 टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे सदर धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये होवू शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये NDRF आवश्यक साहित्यासह तैनात करण्यात आले आहे.

NDRF च्या टिम तैनात

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+