Maharashtra Weather Alert: मुंबईत मुसळधार पाऊस, BMCने दिला अलर्ट, काय असते 'हाय टाइड', जाणून घ्या
Maharashtra Weather Alert : मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकांना प्रवास करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
भारतीय हवामान खात्याने अर्थात आएमडीच्या वतीने सांगण्यात आले की, बहुतेक ठिकाणी पाऊस पहाटे 2 ते सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पाऊस पडला. ज्यामध्ये दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या वतीने, आज दिवसभर देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोमवारी समुद्रात भरतीचा इशारा जारी केला आहे, त्यामुळे लोकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा जारी केला आहे.

हाय टाइड म्हणजे काय?
समुद्राची पातळी सामान्यपेक्षा जास्त झाल्यावर भरती येणे ही एक सागरी घटनाक्रम आहे. मुंबईसारख्या किनारी भागात हे खूप सामान्य आहे, परंतु मुसळधार पावसात भरतीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या काळात समुद्रात खूप उंच लाटा उठतात ज्या भयानक आवाज करतात आणि खूप शक्तिशाली असतात, त्या सर्वात जड वस्तू देखील आपल्या कवेत सामावून घेतात. सहसा एका दिवसात दोन भरती आणि दोन कमी भरती येत असतात. त्यालाच हाय टाईड असे संबोधले जाते.
हे ही वाचा : मुंबई, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता, राज्यात आज कुठे, कुठे मुसळधार पाऊस होणार घ्या जाणून
भरती दरम्यान काय काळजी घ्यावी?
- समुद्रकिनाऱ्यापासून दूर रहा.
- लहान मुलांना किनाऱ्याजवळ एकटे जाऊ देऊ नका.
- बातम्या आणि हवामान अपडेट्स पहा.
- जर भरती आणि मुसळधार पाऊस एकत्र येत असेल तर उंच ठिकाणी जा.
- बोट किंवा समुद्र प्रवास टाळा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
BMCने जारी केलेल्या भरतीच्या वेळा!
बीएमसीनेही भरतीचा इशारा जारी केला आहे, नागरिकांना किनारी भागात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
- भरती-ओहोटी - दुपारी 3:31 - 3.21 मीटर
- कमी भरती-ओहोटी - रात्री 9:41 - 1.86 मीटर
- कमी भरती-ओहोटी - सकाळी 3:31 (17 जून) - 3.44
- कमी भरती-ओहोटी - सकाळी 9:10 (17 जून) - 1.33 मीटर
पाणी साचण्याची परिस्थिती
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बीएमसीने काय दिला इशारा!
हवामान विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी अपडेट्स जारी करत आहे. आयएमडीने लोकांना 'ताज्या माहितीसाठी हवामान विभाग आणि बीएमसीच्या सोशल मीडिया चॅनेल आणि हेल्पलाइन 1916 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.












Click it and Unblock the Notifications