Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा हाहाकार; 19 जिल्ह्यांतील 20 लाख एकरहून अधिक पिकांचे नुकसान, मंदिर बुडाले

Maharashtra Rain Update news : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

राज्याच्या १९ जिल्ह्यांमध्ये, तब्बल २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग यांसारख्या खरीप पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Maharashtra Rain Update news

सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, राज्यातील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड आणि वाशिम आघाडीवर आहेत.

  • नांदेड : २,८५,५४३ हेक्टर (७,१३,८५७ एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान.
  • वाशिम : १,६४,५५७ हेक्टर (४,११,३९२ एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
  • याशिवाय, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून, अनेक सखल भागांत पाणी शिरले आहे. या पुरामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध केजुबाई मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सततच्या पावसामुळे पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळेच पवना नदीची पाणी पातळी वाढली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या जवळ असलेल्या घरांमध्ये आणि शेतीत पाणी शिरले आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.

पुरामुळे जनजीवन विस्कळीत

पवना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक ठप्प झाली असून, काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत.

केजुबाई मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व

पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी पावसाळ्यात नदीची पातळी वाढल्यावर हे मंदिर पाण्याखाली जाते. हा भाग नदीपात्राच्या अगदी जवळ असल्यामुळे, पुराच्या काळात अशी परिस्थिती निर्माण होते.

सध्या मंदिराचा कळस आणि काही भागच पाण्याबाहेर दिसत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+