मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूकीतून माघार, एकही उमेदवार देणार नाही
जालना- काल म्हणजेच रविवारी कोणकोणत्या मतदारसंघात लढणार, हे मनोज जरांगे यांनी सांगितल्यानंतर आज मात्र यू-टर्न घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला. समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत, असे आवाहन आज (सोमवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केले. दरम्यान, काल दिवसभर जरांगे यांनी विधानसभा इच्छुकांची बैठक घेतली होती. मात्र रात्रीतून त्यांनी आपला निर्णय बदलला.

25 मतदारसंघाबाबत झाली होती चर्चा
मराठा, मुस्लिम व दलित समाजाला एकत्र करुन विधानसभा निवडणुकीत लढायचे, असा अजेंडा मनोज जरांगे यांनी गेल्या आठवड्यात मांडला होता. रविवारी रात्री 14 मतदारसंघ ठरवून त्यांनी मराठा समाजाचे उमेदवारही जवळपास ठरवले होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित व मित्रपक्षातील उमेदवार देण्याचा विचार सुरु होता. सोमवारी पहाटेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची व एका जातीवरच लढवायची की मुस्लिम व दलितांना सोबत घ्यायचे का, यावर खलबते झाली. परंतु मित्रपक्षाची यादी सकाळी नऊ वाजेपर्यंत न आल्याने जरांगे पाटील यांनी 25 मतदारसंघात लढण्याचा विचार सोडून दिल्याचे समजते.
कुणीही कामाचे नाही- जरांगे पाटील
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघारीचे कारण सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही एका समाजाच्या जोरावर निवडणूक लढता येत नाही. महाविकास आघाडी किंवा महायुती यातील कुणीच आपल्या कामाचे नाही. त्यामुळे कुणाला पाडा व कुणाला निवडून आणा, असं म्हणण्यात अर्थ नाही. तुम्हाला ज्याला मदत करायची त्याला करा. फक्त त्याच्याकडून मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे असे लिहून घ्या व व्हिडीओ काढून घ्या... आता गणिमी काव्याने ताकद दाखवून देऊ, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
माघारीसाठी दिली ही कारणे
जरांगें यांनी निवडणुकीतून माघार का घेतली, याची काही कारणे समोल आली. त्यापैकी मुस्लिम व दलित मित्रपक्षाची यादी आली नाही, हे पहिले कारण असावे. त्यानंतर एकाच समाजाच्या जोरावर निवडणूका जिंकता येत नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कदाचित हे दुसरं कारण असाव. आणि तिसरं व महत्वाचं कारण म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीतील कुणीही आपल्या कामाचं नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कदाचित हे निवडणुकीतून माघार घेण्याचं तिसरं कारण असावं. मी आणि माझे आंदोलन यावरच आपल्याला काम करायचे असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आपण कोणत्याही पक्षाला किंवा अपक्षाला पाठींबा दिलेला नसल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी पुनश्चः केला.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा







Click it and Unblock the Notifications