पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी! ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; वाचा त्यांचे कार्य
Madhav gadgil passed away environmental expert western ghats contributions : भारतातील पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीचे आधारस्तंभ आणि जगप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते, वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलाने यासंदर्भात माहिती दिली.

गाडगीळ यांच्या जाण्याने निसर्ग आणि विज्ञानाच्या समन्वयाचा एक दुवा निखळला असून, पर्यावरणाशी नाळ जोडलेला एक निस्पृह ऋषी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पश्चिम घाटाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची आणि 'गाडगीळ समिती'च्या अहवालाची दखल केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर घेतली गेली होती.
कोण होते डॉ. माधव गाडगीळ?
डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. ते एक प्रख्यात भारतीय पर्यावरणतज्ज्ञ, लेखक आणि संशोधक होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी बंगळुरू येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (IISc) मध्ये 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस'ची स्थापना केली, जी आज पर्यावरण संशोधनातील एक महत्त्वाची संस्था मानली जाते.
महत्त्वाचे कार्य आणि योगदान
१. गाडगीळ समिती अहवाल
पश्चिम घाटाच्या पर्यावरणाची स्थिती अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली 'वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनेल' नेमले होते. त्यांनी सादर केलेला अहवाल 'गाडगीळ अहवाल' म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये त्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधता वाचवण्यासाठी कडक निर्बंधांची शिफारस केली होती.
२. जैवविविधता कायदा
भारताच्या जैवविविधता कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
३. पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर
स्थानिक समुदायांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेची नोंद ठेवली पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य केले.
४. लेखन क्षेत्रात योगदान
त्यांनी पर्यावरणावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात 'डाइव्हर्सिटी: द इकॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया' यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.
पुरस्कार आणि सन्मान
डॉ. माधव गाडगीळ यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
- पद्मश्री (१९८१)
- पद्मभूषण (२००६)
- शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९८६)
- टायलर पुरस्कार (पर्यावरण क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार - २०१५)
- व्होल्वो पर्यावरण पुरस्कार
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications