शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजांना 'छावा' नाव कसे मिळाले..? काय आहे त्यामागची स्टोरी, वाचा
'शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगलमे घूम रहा है...' या संवादावर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. हा डायलाँग आहे, सध्या चर्चेत अललेल्या छावा चित्रपटातला. महाराष्ट्रात सध्या विकी कौशलच्या 'छवा' चित्रपटाचीच चर्चा आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झाला. चित्रपटाने बाँक्स ऑफिसवर पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटीचा टप्पा पार केला.. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराजांना 'छावा' नाव कसे मिळाले ते बघू.

कोण होते छत्रपती संभाजी महाराज?
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजीराजे फक्त २ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर, त्यांचे संगोपन त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. संभाजी फक्त ९ वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा औरंगजेबाला आग्र्यात पाहिले. लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याच्या शत्रूची क्रूरता माहित होती. औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करुन घेतली तेव्हा संभाजीराजे त्याच्यासोबत होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला मथुरा येथील एका मराठी कुटुंबात सोडले व त्याच्या मृत्यूची अफवा पसरवली.
आक्रमक होते संभाजीराजे
काही दिवसांनी संभाजी महाराज महाराष्ट्रात आले. संभाजीराजे नेहमीच आक्रमक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, तेव्हा संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात होते. त्यावेळी रायगडमधील शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी आणि सरदारांनी संभाजी महाराजांचा सावत्र भाऊ राजाराम याला छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा मराठा सेनापती हंबिरराव मोहिते यांना हे कळले, तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यातून सोडवले. मोहितेच्या मदतीने संभाजींनी रायगड किल्ला जिंकला आणि राजाराम, त्याची आई आणि इतर अनेकांना कैद केले. यानंतर १६८० मध्ये संभाजी महाराज छत्रपती म्हणून मराठा गादीवर बसले. प्रथम, त्याने मुघल शहर बुरहानपूरवर हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. याशिवाय संभाजींनी औरंगजेबाचा मुलगा अकबर यालाही संरक्षण दिले होते.
औरंगजेबाने षडयंत्राने पकडले
१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज एका बैठकीसाठी संगमेश्वरला आले होते. तेव्हा मुघल सरदार मुकर्रब खानची फौज आधीच तिथे उपस्थित होती. मुघल सैन्याने संभाजींवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि संभाजी महाराज आणि त्यांचे मंत्री कवी कलश यांना तुरुंगात टाकण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मंत्र्याला कैद करून बहादूरगडला नेण्यात आले. तिथे त्याला ४० दिवस मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. जेव्हा संभाजी महाराज औरंगजेबासमोर हजर झाले तेव्हा मुघल बादशहाने गुडघे टेकले आणि अल्लाहचे आभार मानले. औरंगजेबाने संभाजींना इस्लाम स्वीकारण्याची ऑफर दिली आणि त्या बदल्यात त्यांना जीवदान दिले जाईल. यावर संभाजी म्हणाले की, राजाने मला त्याची मुलगी दिली तरी मी इस्लाम स्वीकारणार नाही. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना प्रचंड यातना देऊन ठार मारले.
कसे मिळाले छावा हे नाव?
छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू. संभाजी महाराज स्वभावाने खूप क्रोधी आणि शक्तिशाली होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १२० युद्धे लढली आणि ती सर्व जिंकली होती. मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि त्यांचा मुलगा संभाजी यांना सिंहाचा पिल्लू म्हणजेच छावा म्हटले होते. ही कादंबरी सर्वात लोकप्रिय होती. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रात छावा म्हणून संबोधले जाऊ लागले.












Click it and Unblock the Notifications