Ganesh Chaturthi 2024 Katha: विघ्नहर्त्या विनायकाचा असा झाला जन्म; जाणून घ्या काय आहे कथा?
Ganesh Chaturthi 2024 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पा जन्म झाला. याच दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होते. पुराणात श्रीगणेशाच्या जन्मासंबंधी अनेक कथा आहेत, परंतू सर्वात लोकप्रिय असणारी कथा आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
पुराणातील कथेनुसार एकदा शंकर महादेव स्नानासाठी भोगावतीच्या तीरावर गेले होते. भगवान शिवाचे त्यांचे सहकारीही त्यांच्यासोबत गेले. कैलास पर्वतावर पार्वतीशिवाय कोणीच नव्हते. दरम्यान माता पार्वतीलाही स्नानाला जायचे होते, मात्र सुरक्षेसाठी दारात कोणीच नव्हते.
म्हणून पार्वतीने आपल्या शरीरातील मळापासून एक पुतळा तयार केला आणि त्याचे नाव गणेश ठेवले, म्हणजेच सर्व गणाचे देवता. पार्वतीने त्याला सांगितले, हे पुत्रा, मी तुला माझ्या मळापासून निर्माण केले आहे. तू माझा मुलगा आहेस. मी आंघोळ करायला आत जात आहे, तू बरोबर दारात बस आणि मी परवानगी देत नाही तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नको.

काही वेळाने भोगावतीवरुन स्नान करून महादेव कैलासात आले तेव्हा त्यांना दारात एक बालक बसलेला दिसला. त्याने त्यांना आत जाण्यापासून रोखले. महादेवाने विचारले, बाळा, तू कोण आहेस आणि मला आत जाण्यापासून का थांबवत आहेस? बालक म्हणाला, "माझी आई आत आंघोळ करत आहे आणि तिने मला कोणालाही आत येऊ देऊ नकोस" असे सांगितले आहे.
'भोजनाला उशीर झाल्यामुळे शिवजी रागावले होते!' त्यांनी बालकाला समजावून सांगितले की मी शिवशंकर आहे आहे. मला आत जाऊ दे पण बालकाने त्यांना जबरदस्तीने थांबवले. यावर संतप्त होऊन भगवान शंकराने मुलाचे शीर शरीरापासून वेगळे केले. शिवशंकर आत गेल्यावर पार्वतींकला समजले की भोजनास उशीर झाल्यामुळे महादेव रागावले आहेत, म्हणून तिने जेवणासाठी दोन ताट ठेवली.
महादेवाने विचारले ही दुसरी थाळी कोणासाठी आहे, तर पार्वती म्हणाली दुसरी थाळी माझ्या मुलासाठी आहे. तो तुम्हाला दारात दिसला नाही? महादेव म्हणाले, तुझा मुलगा पहारा देत होता. मी त्याला अवज्ञाकारी मूल मानले आणि त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून पार्वती खूप दुःखी झाली.
'माझ्या मुलाला लवकर परत आणा नाहीतर मीही माझा जीव देईन', अशी व्यथा पार्वतीने मांडली. महादेव म्हणाले की आता पुन्हा ते डोके जोडणे शक्य नाही. पार्वती म्हणाली, काहीही करा, मला माझा मुलगा परत हवा आहे.
यावर भगवान शिवांनी आपल्या गणांना चारही दिशांना पाठवले आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली असेल, तिच्या मुलाचे डोके कापून परत आणा. गणांनी पहिली गोष्ट पाहिली ती एक हत्ती हत्तीन होती तिच्या मुलाकडे पाठ करून झोपली होती.
गणांनी त्या हत्तीचे शीर कापून कैलासात आणले. भगवान शंकरांनी हत्तीचे डोके बालकाला बसविले ठेवले आणि ते मूल जिवंत झाले. भगवान महादेवाने त्या बालकाचे नाव गजानन ठेवले. म्हणजे गज म्हणजे हत्तीचे मस्तक असलेला. ही घटना भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी घडली, म्हणून या दिवशी गणेशाची जयंती साजरी केली जाते.
Disclaimer: या लेखाचा अर्थ कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi या लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडित यांचे मत घ्या.)












Click it and Unblock the Notifications