Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणं म्हणजे विकास नव्हे'; फडणवीसांचा ठाकरे बंधूंना बोचरा टोला

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. "परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे मुंबईचा विकास नव्हे," अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंच्या राजकारणावर प्रहार केला.

Devendra Fadnavis on Thackeray Brothers

मराठी अस्मिता आणि विकासाचा प्रश्न

मुंबईतील मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना धारेवर धरले. गेल्या २५ वर्षांच्या सत्ताकाळाचा हिशोब मागताना ते म्हणाले की, "मराठी माणसाचा विकास केला म्हणजे नक्की काय केलं? तुमच्या सत्ताकाळात मराठी माणसाला मुंबई सोडून बाहेर जावं लागलं, याला विकास म्हणता येणार नाही."

फडणवीस काय म्हणाले?

क्षेत्रीय अस्मिता : महाराष्ट्राला स्वतःची क्षेत्रीय अस्मिता आहे आणि मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे.

सुरक्षितता : मराठी माणूस महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरक्षित राहिला पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे.

संकुचित वृत्तीला थारा नाही : मराठी माणूस हा कधीच संकुचित विचार करत नाही, त्यामुळे मराठी आणि अमराठी असा भेदभाव करून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

हिंदुत्वाची नवी व्याख्या आणि 'भीतीसंगम'

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपच्या हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली. "आमचं हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीवर अवलंबून नाही, तर प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हिंदू मानतो," असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी आणि हिंदू हे वेगळे होऊ शकत नाहीत, असे सांगत त्यांनी या दोन्ही मुद्द्यांची सांगड घातली.

ठाकरे बंधूंच्या बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "ही युती म्हणजे 'प्रीतीसंगम' नसून 'भीतीसंगम' आहे. केवळ अस्तित्वाची भीती वाटत असल्यानेच हे पक्ष एकत्र आले आहेत."

बीडीडी चाळ पुनर्विकास आणि श्रेयवाद

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांशी थेट संवाद साधला. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून सध्या महायुती आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मोठा श्रेयवाद सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष चाळीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यावर रहिवाशांनी फडणवीसांचे आभार मानले, जे महायुतीसाठी सकारात्मक चिन्ह मानले जात आहे.

महायुतीचा विजयाचा संकल्प

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे वर्चस्व राहील, असा ठाम विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे दावे खालीलप्रमाणे आहेत. मुंबई महानगरपालिका महायुतीचा झेंडा फडकणार आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल. पुणे व पिंपरी-चिंचवड येथेही महायुतीच स्पष्ट बहुमताने विजयी होईल.
एकूण महापालिका राज्यातील २६ ते २७ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+