राहुल गांधी, ठाकरेंनंतर आता देवेंद्र फडणवीसांचीही निवडणूक आयोगावर सडकून टीका! नेमकं काय घडलं..वाचा
Devendra Fadnavis Slams Election Commission for Postponing Nagar Panchayat Polls : महाराष्ट्रातील काही विशिष्ट नगर पंचायतींच्या निवडणुका अचानक रद्द (Postpone) करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच फडणवीस यांनीही या निर्णयावर थेट भाष्य करत, निवडणूक आयोगाचा हा निर्णय 'पूर्णपणे चुकीचा' असल्याचे मत व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक स्थगिती दिल्याने कार्यकर्त्यांचे झालेले नुकसान आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फडणवीस यांचा नेमका आक्षेप काय?
निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या अभ्यासक्रमाचा दाखला दिला आणि आपला राग व्यक्त केला. "मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चुकीचं आहे." अशा पद्धतीने प्रत्येक वेळी कोणी कोर्टात जाईल आणि निवडणुका पोस्टपोन होतील, असं आजपर्यंत कधी झालं नाही. निवडणूक आयोग कुठला कायदा काढतोय, कोणाचा सल्ला घेतोय याची मला कल्पना नाही."
फडणवीसांनी दिले निलंग्याचे उदाहरण
"निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती, एका व्यक्तीचा फॉर्म रद्द झाला म्हणून तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. मग एका व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूक पुढे ढकलणे, हे चुकीचे आहे.
कार्यकर्त्यांवर अन्याय..
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगाच्या "या निर्णयामुळे त्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, ज्यांनी या इलेक्शनची तयारी केली. उद्या निवडणुका आणि आज तुम्ही पोस्टपोन करता, त्यांची पैसा, त्यांची मेहनत, या सर्व गोष्टी वाया गेल्या. पंधरा-वीस दिवस त्यांनी आता पुन्हा प्रचार करायचा, हे मला अतिशय चुकीचे वाटते."
'नगर विकास विभागाचा संबंध नाही': स्वायत्ततेवर स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणात नगर विकास विभागाचा कोणताही संबंध नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, "नगर विकास विभागाचा या प्रकरणात संबंधच नाही, इलेक्शन विभागाचा संबंध आहे. इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला तो आपल्याला मान्य करावा लागेल, पण माझं मत आहे की हा निर्णय चुकीचा आहे." फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या पाच संदर्भातला 'रिप्रेझेंटेशन' निवडणूक आयोगाला निश्चितच दिला जाईल आणि निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे आहे, हे आयोगाला सांगितले जाईल.
-
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
T20 World Cup 2026 : वानखेडेवर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! इंग्लंड टॉस जिंकला; भारताला फलंदाजीचे आव्हान -
इराणच्या शक्तिशाली घराण्यातील गुप्त संघर्ष: मोजतबा खामेनींचे वैयक्तिक आयुष्य अन् सर्वोच्च नेतेपदाची -
वानखेडेवर टीम इंडियाचा धमाका! इंग्लंडचा पराभव करत भारत चौथ्यांदा T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
अदानी टोटल गॅसकडून CNG आणि घरगुती PNG चे दर स्थिर; काही उद्योगांच्या पुरवठ्यात कपात -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग!











Click it and Unblock the Notifications