Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली कार बॉम्बस्फोटामागे कुणाचा हात? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप, 5 मुद्द्यात समजून घ्या केस

Devendra fadnavis on delhi bomb blast pakistan allegation : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाबद्दल एक गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात बोलताना, त्यांनी हा आरोप केला असून या आरोपामुळे कट कारस्थान आणि देशविघातक कत्यांना एक व्यक्ती नव्हे तर एक राष्ट्र जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या आरोपामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळील स्फोटात दहा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

Devendra fadnavis on delhi bomb blast pakistan allegation

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

शेजारील देश थेट युद्धात भारताला हरवू शकत नसल्याने दहशतवादी कारवायांचा आधार घेत आहे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. पहलगाम हल्ल्यापासून ते दिल्लीतील स्फोटापर्यंत पाकिस्तानचा हात असून, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता, असा मोठा दावा त्यांनी केला. सुरक्षायंत्रणांच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, तर दहशतवादाविरोधातील भारताच्या नव्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला.

पाच महत्त्वाचे मुद्दे

१. दिल्ली बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचा हात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. पाकिस्तान सरळ युद्धात भारताला हरवू शकत नाही, म्हणूनच ते दहशतवादी कारवायांवर अवलंबून आहेत, असे त्यांनी सांगितले.

२. संपूर्ण देशात हल्ल्याचा कट उधळला

फडणवीस यांच्या मते, दहशतवाद्यांचा हेतू 'भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा' होता. मुंबईसह देशातील अनेक मोठी शहरे त्यांच्या निशाण्यावर होती. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करून ३,००० किलो दारूगोळा जप्त करत 'पांढऱ्या कपड्यांतील दहशतवादी गट' उध्वस्त केल्याबद्दल त्यांनी सुरक्षा यंत्रणांची प्रशंसा केली.

Take a Poll

३. 'दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दहशतवादावरील भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. 'दहशतवाद आणि चर्चा (Terror and Talks) एकत्र होऊ शकत नाहीत,' असे सांगून त्यांनी लष्कराला कारवाईचे 'स्वातंत्र्य' दिले. 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे जगाने भारताची ताकद पाहिली, असे ते म्हणाले.

४. २६/११ आणि पहलगाम हल्ल्याची आठवण

मुंबईतील २००८ च्या २६/११ हल्ल्याच्या वेदना आजही मनात आहेत, असे फडणवीस म्हणाले. मुंबईवर हल्ला करणे म्हणजे भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय ताकदीवर हल्ला करणे होते. तसेच, त्यांनी मे २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या सीमापार कारवाईचाही उल्लेख केला.

५. पूर्वी कारवाई करण्याची हिंमत नव्हती

जर २६/११ च्या वेळी 'ऑपरेशन सिंदूर' करण्याची हिंमत दाखवली असती, तर कोणीही पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत केली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज भारत बदलला आहे आणि आता आपण धोके ओळखून थेट कारवाई करतो, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+