Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Devendra fadnavis : 29 पैकी 'एवढ्या' मनपावर महायुतीचा विजय! CM फडणवीस काय म्हणाले? 5 मुद्द्यात भाषण

Devendra fadnavis bmc election victory speech 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकत असतानाच, मुंबई महापालिकेतही स्पष्ट बहुमताचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि 'व्यापक हिंदुत्वा'ला दिले.

Devendra fadnavis bmc election victory speech

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

१. मुंबईत महायुतीचाच झेंडा फडकणार

"मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला काहीसा उशीर होत असला आणि अधिकृत शिक्कामोर्तब बाकी असले, तरी कलानुसार मुंबईत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल यात शंका नाही. मुंबईच्या महापालिकेत आता महायुतीचाच झेंडा फडकणार, हे निश्चित झाले आहे." असे फडणवीस म्हणाले.

२. विकासाच्या अजेंड्याला 'रेकॉर्ड ब्रेक' प्रतिसाद

"आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन जनतेमध्ये गेलो होतो. ज्या प्रकारे विविध महापालिकांमध्ये 'रेकॉर्ड ब्रेक' मँडेट मिळाले आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की लोकांना केवळ विकास आणि प्रामाणिकता हवी आहे. लोकांनी भाजपवर विश्वास टाकला आहे." असे फडणवीस म्हणाले.

३. पंतप्रधान मोदींवरील 'महाविश्वास' आणि बाळासाहेबांचे स्मरण

"या निकालाने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राचा 'महाअविश्वास' केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. या विजयाच्या निमित्ताने मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतो, त्यांचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी होता म्हणूनच आपल्याला हे यश मिळाले आहे." असे फडणवीस म्हणाले.

४. व्यापक हिंदुत्व आणि आमचा आत्मा

"हिंदुत्ववाद हा आमच्या कार्याचा आणि विचारांचा आत्मा आहे. आम्ही संकुचित नाही, तर 'व्यापक हिंदुत्व' मानणारे लोक आहोत. या भारताच्या संस्कृतीला आणि प्राचीन जीवनपद्धतीला जे आपली मानतात, त्या सर्वांचा समावेश आमच्या हिंदुत्वात आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही." असे फडणवीस म्हणाले.

५. जिंकल्यानंतर उन्माद नको, जबाबदारीने वागा

"कार्यकर्त्यांना माझे सांगणे आहे की, एवढे मोठे यश मिळाल्यावर जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. जिंकल्यानंतर कुणीही उन्माद करू नये. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे कारभार करावा. पंतप्रधान मोदींनी जो विश्वास निर्माण केला आहे, तो आपल्याला सार्थ ठरवायचा आहे." असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : Pune election पुणे-पिंपरीच्या निवडणुकीत अजित पवारांचा गड का कोसळला? BJPच्या विजयाचे 5 मोठे फॅक्टर्स

हेही वाचा : BMC Election Results : मुंबईत भाजप नंबर -1; ठाकरे बंधू पराभूत का झाले, वाचा 5 मोठी कारणे

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+