काळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी आरोपीला अटक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नागपूर: नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरात समाजकंटकांकडून काही पत्रक वाटण्यात आली होती. या पत्रकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. काही विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे या पत्रकात लिहिलेले होते. दरम्यान, या प्रकरणात नाशिकमधील पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी बोलताना दिली. ते पत्रकारांसोबत नागपूरमध्ये बोलत होते. या पत्राच्या हेतूमागचा तपास पोलीस करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आक्षेपार्ह पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे.
त्यामागे काय हेतू आहे याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
काळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
अशा पत्रामागच्या हेतूचा पोलीस तपास करत आहेत…
(माध्यमांशी संवाद | नागपूर | 23-6-2024)#Maharashtra #Kalarammandir #Police pic.twitter.com/TboWqu42kA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 23, 2024
आरोपीच्या पाठीशी असलेल्यांचा शोध सुरू
काळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
अशा पत्रामागच्या हेतूचा पोलीस तपास करत आहेत…
(माध्यमांशी संवाद | नागपूर | 23-6-2024)#Maharashtra #Kalarammandir #Police pic.twitter.com/TboWqu42kA
आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते.
त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व बाबींची चौकशी नाशिक पोलीस करत आहे.
तसेच हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राजकीय नेत्यांनी शहानिशा करावी
या प्रकरणी विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जात होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, काही राजकीय नेत्यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं. या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल.
यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे कान टोचले.
या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. ही किड संपवा. कोण असेल त्याला बेड्या ठोका. आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाणार. बघू कोण रोखते ते, अशा शब्दांत आव्हाड यांनी हे पत्रक जारी करणाऱ्यांना इशारा दिला होता.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications