'मुस्लिमांना धमकावले जात आहे', रामगिरी महाराजांच्या विरोधात MIM ची 'चलो मुंबई तिरंगा रॅली'
एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितीश राणे यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्याविरोधात आवाज उठवला आहे. सातत्याने मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायकारक विधानाच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून 'चलो मुंबई तिरंगा रॅली' काढली.
इम्तियाज जलील यांनी रॅलीच्या सुरूवातीलाच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी आमची आहे. महाराष्ट्रात सद्या कायद्याचे राज्य चालू नाही. कोणीही उठून मुस्लिम समाजाला धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावाखाली भिंती उभारल्या जात आहेत, त्यामुळे दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जलील म्हणाले, "या गुन्हेगारी कृत्यांवर कारवाई व्हायला नको का? त्यामुळेच राज्यघटना आणि कायद्यानुसार देश चालवला जाईल, याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी आम्ही मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे." कठोर कायदे करण्याची मागणीही इम्तियाज जलील यांनी कोणत्याही जाती, धर्म, धार्मिक महापुरुषांना लक्ष्य करणाऱ्या अशा विधानांवर कठोर कायदे करण्याची मागणी केली. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप करून ते म्हणाले की, ६० हून अधिक एफआयआर नोंदवूनही कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे पोलिस निष्क्रीय राहिल्याचे जलील यांचे मत आहे.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar: AIMIM Maharashtra chief Imtiaz Jaleel says, "...The walls of caste and religion are being erected in Maharashtra. Attempts are being made to flare-up riots. Muslims are being threatened from the stage, are these not criminal acts? Should action… https://t.co/Ej3ULL0qPU pic.twitter.com/tYi8w1A4U7
— ANI (@ANI) September 23, 2024
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी रॅली निघणार आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांना दिवसाढवळ्या महाराजांकडून धमक्या दिला जात आहेत. हे आम्हाला सहन होणारे नाही, आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ शकतो. पण आम्हाला संस्कृतीची जाण आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जात आहे. तो आम्हाला मान्य नाही. आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत जात आहोत. नाशिक नंतर आमची रॅली अधिक विस्तारेल, इतिहासात सर्वात मोठी रॅली ही आज निघेल, असा विश्वास माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications