Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ही रणनीती वापरुन महायुती महाराष्ट्रात जिंकणार जास्त जागा! पण सत्ता मिळणार का? घ्या जाणून

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला, याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून युतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. शिवाय महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी यासाठी सविस्तर सर्वेक्षणाची तयारी मात्र आपापल्या स्तरावरून सुरू केली आहे.

हे तिन्ही पक्ष वेगवेगळे सर्वेक्षण का करीत आहे? याचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती फायदा होईल चला तर यासंदर्भात जाणून घेऊया.

BJP  Shiv Sena  NCP Independent survey

288 विधानसभा जागांचा स्वतंत्र सर्वे

महायुती आघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांचे स्वतंत्र सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणाचा उद्देश संबंधित विधानसभेच्या जागांच्या परिस्थितीचे आकलन करणे हा असेल. सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित जागावाटपाचा आराखडा मात्र, स्वतंत्र सर्वेक्षण करण्यासाठी सत्ताधारी आघाडीतील तीन पक्षांकडून विशेष रणनीती आखली जात आहे.

असे होईल जागा वाटप

महायुतीच्या एका नेत्याचे म्हणणे आहे, 'हे सर्वेक्षण प्रत्येक विधानसभेच्या जागेवर त्यांच्या (तीन पक्षांच्या) विजयाच्या शक्यता समजून घेण्यासाठी आहे. यानंतर तिन्ही सर्वेक्षणांच्या निकालांची तुलना केली जाईल आणि या आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत जागांचे वाटप केले जाईल.

'विजयाची शक्यता हाच निकष'

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागा अदलाबदल किंवा जागावाटपात 'विजयाची शक्यता हाच निकष' असेल. महायुतीच्या एका खासदाराचे म्हणणे आहे की, युतीचा विजय निश्चित करण्यासाठी मित्रपक्षांमध्ये जागांची अदलाबदल केली जाईल. तेच खासदार म्हणतात, 'सध्या आमच्याकडे जवळपास 200 विद्यमान आमदार आहेत. विद्यमान आमदारांना त्यांच्या जागा द्याव्यात, असे कोणी म्हणत असले तरी आमच्याकडे जवळपास 88 जागा शिल्लक आहेत, त्यावर निर्णय घ्यावा लागेल.

एकमेकांना जागा सोडतील का?

एकंदरीतच यावरून असे दिसते की, सर्वेक्षण होऊनही मित्रपक्षांना आपल्या जागा देण्यास कोणताही पक्ष राजी होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उदाहरण घेता येईल. लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे, परंतु विधानसभेत त्यांना भरघोस जागा मिळतील, यासाठी आधीच वातावरण तयार केले जात आहे.

..म्हणून लंके शरद पवार गटात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते म्हणतात 'अहमदनगर आणि माढा या जागा मिळाल्या असत्या तर (लोकसभा निवडणुकीत) ), तर आम्ही जिंकलो असतो. नीलेश लंके यांना अहमदनगरमधून निवडणूक लढवायची होती. त्यांनी स्वतःसाठी किंवा पत्नीसाठी ही जागा मागितली होती, पण आम्हाला ही जागा मिळू शकली नाही. लंके हे शरद पवार गटात सामील झाल्याने भाजपला ही जागा वाचवता आली नाही.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुती आघाडीला केवळ 17 जागा जिंकता आल्या. भाजपला 9 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे.

सत्ता मिळणार का?

महायुती विजयाची शक्यता हा निकष ठेवून जागा अदलाबदल अथवा जागावाटप करणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणातील महत्वाचे बारकावे जिंकण्यासाठी उपयुक्त ठरेल, त्यातून जागा जास्त मिळू शकतात पण सत्ता मिळेल का हे मात्र अद्याप सांगता येणार नाही, दुसरीकडे महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे त्यामुळेआगामी काळात महायुतीला खुर्ची मिळेल की सत्तेतून बाद होईल हे लवकरच समजेल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+