मुख्यमंत्रीपद ठरले, महायुतीचे गृहखात्यावरुन घोडे अडले! भाजप-शिवसेनेत कलगीतुरा! वाचा कोण काय म्हणाले?
BJP Eknath Shinde's shivsena Dispute over post of Home Minister : महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झाले पण गृहखाते कुणाकडे राहणार हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. गृहखाते भाजपकडे कि शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार या प्रश्नावरुन आता कलगीतुरा रंगत आहे.
याच कारणामुळे सत्ता स्थापनेचे घोडे अडल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी गृहमंत्री पद हवे हे बोलून दाखवले त्यातच आज गृहमंत्रीपदावरुन राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सूचक विधान केले आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने कालच पाठींबा दिला आहे. यापूर्वीही आम्ही हेच सांगितले होते. त्यामुळे तो डेडलाॅक संपला आहे. असे म्हणतानाच आता मुख्यमंत्रीपदाचा सुटला पण गृहखात्याचा डेट'लाॅक' एकनाथ शिंदेंनी केला अशी शक्यता आता व्यक्त होत आहे आणि हाच डेट लाॅक महायुतीत पाहायला मिळत आहे.
गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरामासाठी आपल्या सातारा येथील दरे गावात गेले होते, दोन दिवस तिथे त्यांनी आराम केला पण या काळात त्यांनी काही व्युव्हरचना तयार केली असेल हे सांगितले जात आहे. सध्या ते चर्चेचीच भाषा करीत असल्याने व्युव्हरचनेसंदर्भातील त्यांची तयारी पुर्वनियोजित होती असे जाणकार सांगत आहेत.
गृहखाते अन् सभापतीपदावर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांना गृहखाते आणि सभापदीपदावर प्रश्न विचारल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले होते की, चर्चा होईल आणि त्यातून बऱ्याचशा काही गोष्टी सुटतील सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे कल्याण करणे होय. एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर तोलून मापून मोजकेच बोलत आहेत त्यावरुन त्यांना हे पद हवे आहे असे दिसते, याला शिवसेनेचे एक एक नेते गृहमंत्रीपद हवे म्हणून उघड मागण्या करत आहेत. संजय शिरसाट असो की, शंभुराजे देसाई अथवा भरत गोगावले यांनी ही मागणी केली होती.
गृहखात्यावरुन काय म्हणाले शिवसेनेचे 3 नेते
संजय शिरसाट यांनी शिवसेनेलाच गृहखाते द्यावे अशी मागणी केली आहे. तर शंभुराज देसाई यांनीही या मागणीला जोरदिला. अंतीम निर्णय हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करुन ठरवतील असे ते म्हणाले. तर भरत गोगावले म्हणाले की, गृहमंत्रालय मागच्यावेळी फडणवीस यांच्याकडे होते तसे आमच्याकडे यावेळी गृहमंत्रीपद द्यावे ही मागणी आहे. यात चुकीचे काय असा सवालही त्यांनी केला आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications