राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर! महाराष्ट्रातील 'या' दिग्गज नेत्यांना संधी! वाचा विजयाचे गणित
Bjp candidates list rajya sabha election 2026 : केंद्रीय राजकारणात महाराष्ट्राचे वजन वाढवण्यासाठी भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर भाजपने महाराष्ट्रातील ४ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार रामराव वडकुते आणि माया चिंतामण ईवनाते यांचा समावेश आहे. या निवडीतून भाजपने सामाजिक समतोल आणि पक्षनिष्ठा या दोन्ही गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यसभेची निवडणूक येत्या १६ मार्च २०२६ रोजी होणार आहे, त्याआधीच भाजपचे महाराष्ट्रातील हे उमेदवार संभाव्य खासदार मानले जात आहे कारण, विरोधी पक्ष २ जागी विजयी होईल एवढेच त्यांच्याकडे संख्याबळ असल्याने या उमेदवारांच्या दणदणीत विजयाची अपेक्षा भाजपला आहे.

भाजपचे ४ शिलेदार: कोणाला का मिळाली संधी?
- १. विनोद तावडे: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत ठसा उमटवल्यानंतर तावडे आता अधिकृतपणे संसदेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला राष्ट्रीय स्तरावर होणार आहे.
- २. रामदास आठवले: मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री आठवले यांना पुन्हा संधी देऊन भाजपने दलित मतांचे समीकरण कायम ठेवले आहे.
- ३. रामराव वडकुते: धनगर समाजाचे नेतृत्व करणारे वडकुते यांना उमेदवारी देऊन भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी मतदारांना मोठा संदेश दिला आहे.
- ४. माया चिंतामण ईवनाते: आदिवासी समाजातील चेहरा असलेल्या माया ईवनाते यांना संधी देऊन भाजपने विदर्भातील आदिवासी पट्ट्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
विजयाचे समीकरण: भाजपचे ४ उमेदवार कसे निवडून येणार?
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार विजयाचे गणित समजून घेऊया.
कोटा किती?
राज्यसभेच्या एका जागेसाठी साधारणपणे ३७ ते ४१ मतांची (विधानसभा सदस्यांची मते) आवश्यकता असते.
भाजपची ताकद किती?
महायुती आणि भाजपचे स्वतःचे संख्याबळ पाहता, भाजपचे ४ उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर सहज निवडून येऊ शकतात.
महायुतीचे नियोजन काय आहे?
भाजपने ४ जागांवर दावा केला असून, उर्वरित ३ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला जागा जाण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षाचे गणित अन् विजयाची दावेदारी
महाविकास आघाडीकडे सध्या १ ते २ जागा निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचे हे चारही उमेदवार बिनविरोध किंवा मोठ्या फरकाने विजयी होतील असे चित्र आहे.
राजकीय समीकरण समजून घेऊया..
या उमेदवारी यादीतून भाजपने जुन्या जाणत्या नेत्यांना (विनोद तावडे) पुन्हा मुख्य प्रवाहात आणले आहे, तर दुसरीकडे मित्रपक्षांना (रामदास आठवले) सोबत घेऊन 'सबका साथ'चा नारा दिला आहे. रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांच्या निवडीमुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीपातींचे समीकरण जुळवण्याचा मोठा प्रयत्न भाजपने केला आहे.












Click it and Unblock the Notifications