प्रज्ञा सिंहसह 7 जण निर्दोष सुटल्यानंतर असदु्द्दीन ओवैसींचे BJP फडणवीसांना 5 तिखट सवाल, पोस्ट चर्चेत
Asaduddin Owaisi's 5 questions on outcome of the Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामध्ये भाजप नेत्या प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतरांचा समावेश आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिकमधील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलला बांधलेल्या स्फोटक यंत्राचा स्फोट झाला, ज्यामध्ये सहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले होते.

आता या निर्णयानंतर असदु्द्दीन ओवैसींनी सवाल उपस्थित केले आहे, यातच देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला आणि भाजपला त्यांनी काही सवाल केले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वे बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्ततेला स्थगिती देण्याची मागणी मोदी आणि फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने तातडीने केली, त्याप्रमाणे मालेगाव बाॅम्बस्फोटासंबंधीत निकालावर अपील करतील का? असा सवाल त्यांनी केला आहे, यासह महाराष्ट्रातील "धर्मनिरपेक्ष" राजकीय पक्ष जबाबदारीची मागणी करतील का? असे विचारले आहे.
1. The Malegaon blast case verdict is disappointing. Six namazis were killed in the blast and nearly 100 were injured. They were targeted for their religion. A deliberately shoddy investigation/prosecution is responsible for the acquittal.
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 31, 2025
2. 17 years after the blast, the Court…
असदु्द्दीन ओवैसींचे पाच वक्तव्य अन् सवाल
१. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल निराशाजनक आहे. या स्फोटात सहा नमाज्यांना मारण्यात आले आणि जवळपास १०० जण जखमी झाले. त्यांना त्यांच्या धर्मासाठी लक्ष्य करण्यात आले. जाणूनबुजून केलेल्या निकृष्ट तपास/प्रकरणामुळे ही निर्दोष मुक्तता झाली.
२. स्फोटानंतर १७ वर्षांनी, न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्ततेला स्थगिती देण्याची मागणी मोदी आणि फडणवीस सरकार ज्या पद्धतीने तातडीने केली त्याप्रमाणे या निकालावर अपील करतील का? महाराष्ट्रातील "धर्मनिरपेक्ष" राजकीय पक्ष जबाबदारीची मागणी करतील का? ६ जणांची हत्या कोणी केली?
३. लक्षात ठेवा, २०१६ मध्ये या खटल्यातील तत्कालीन सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी रेकॉर्डवर म्हटले होते की एनआयएने त्यांना आरोपींबाबत "मऊ" राहण्यास सांगितले होते. लक्षात ठेवा, २०१७ मध्ये एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. तीच व्यक्ती २०१९ मध्ये भाजपची खासदार झाली.
४. करकरे यांनी मालेगावमधील कट उघडकीस आणला होता आणि दुर्दैवाने २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. भाजप खासदाराने रेकॉर्डवर म्हटले होते की तिने त्यांना शाप दिला होता आणि त्यांचा मृत्यू त्यांच्या शापामुळे झाला.
५. एनआयए/एटीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीच्या तपासासाठी जबाबदार धरले जाईल का? मला वाटते की आम्हाला उत्तर माहित आहे. हे "दहशतवादाविरुद्ध कठोर" मोदी सरकार आहे. जगाला हे लक्षात राहील की त्यांनी एका दहशतवादाच्या आरोपीला संसद सदस्य बनवले.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
देवेंद्र फडणवीसांचे पोस्ट चर्चेत
प्रज्ञा सिंह यांच्यासह १२ जणांची एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यावर भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ओळीत पोस्ट केली आहे ती पोस्ट आता चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदीतून "आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!" असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता असदु्द्दीन ओवैसींची पोस्ट समोर आली आहे, आता या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल का? असा त्यांनी सवाल केला आहे.












Click it and Unblock the Notifications