नागपूरकरांना दिलासा; हिंसाचाराच्या 8व्या दिवसानंतर संपूर्ण संचारबंदी हटवली, आता नुकसान भरपाईची तयारी
Nagpur violence curfew lifted in the entire city : 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर नागपूरच्या अनेक भागात लावण्यात आलेला संचारबंदी आजपासून पूर्णपणे उठवण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना आता मुक्तसंचार करण्यास मुभा मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी 11 पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू केला होता. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, गणेशपेठ आणि यशोधरानगर पोलिस स्टेशन परिसरात लादलेले निर्बंधही रविवारपर्यंत हटविण्यात आलेले आहेत. तरी पोलिसांची या भागात जास्त नजर असणार आहे.
सुरूवातीला अशी हटवली गेली संचारबंदी
सुरुवातीला नंदनवन आणि कपिलनगर भागातून निर्बंध उठवण्यात आले. त्यानंतर, झोन 3 अंतर्गत पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंज आणि झोन 4 अंतर्गत सक्करदरा आणि इमामवाडा येथून संचारबंदी उठवण्यात आली. पूर्णपणे उठवण्यापूर्वी, काही भागात कर्फ्यूच्या अटी शिथिल करण्यात आल्या, ज्यामुळे लोकांना विशिष्ट वेळेत आवश्यक खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली.

यशोधरानगरमध्ये कर्फ्यू उशीरा का हटवला?
यशोधरानगरमध्ये हे झोन 5 मध्ये येते आणि हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीच्या मृत्यूनंतर, संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आणि त्यात कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही. 40 वर्षीय इरफान यांचे शनिवारी रुग्णालयात निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 17 मार्च रोजी रात्री 11 वाजता तो इटारसीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी घराबाहेर पडला होते. तेव्हा ते हिंसाचाराचे बळी ठरले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. यामुळेच या भागात लादलेले निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत.
दंगलखोरांकडून नुकसान भरपाई केली जाणार
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे की हिंसाचारात झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी "दंगलखोरांवर" कारवाई केली जाईल. ते म्हणाले, 'दंगलीत झालेल्या एकूण नुकसानाची गणना केली जाईल आणि ती फक्त दंगलखोरांकडूनच वसूल केली जाईल.
जर दोषींनी नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांची मालमत्ता विकून नुकसान भरून काढले जाईल, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एवढेच नाही तर फडणवीस यांनी "बुलडोझर अॅक्शन" चा इशाराही दिला.
अनेकांना अटक
नागपूर शहरातील हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांची स्थानिक पोलिसांकडून ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. नागपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे डझनभर आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे.
नागपूर पोलिसांनी सांगितले की, हिंसाचार प्रकरणी 105 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. स्थानिक पोलिस सायबर सेल आणि सोशल मीडियाचीही चौकशी करत आहेत.












Click it and Unblock the Notifications