Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Thailand Vs Cambodia : शिवमंदिरावरुन पेटला वाद, थायलंड-कंबोडियात युद्ध, जाणून घ्या वादाचा इतिहास!

Thailand-Cambodia war Update News : थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर बनली आहे.

कंबोडियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात १२ थाई नागरिकांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. या भयंकर हल्ल्यानंतर थायलंडने तातडीने प्रत्युत्तर देत कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवरच प्रथम हल्ला केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे या संघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे.

प्रथम हल्ल्याचे आरोप-प्रत्यारोप

या ताज्या संघर्षाची नेमकी सुरुवात कोणी केली, यावरून दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कंबोडियन परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, सकाळी थाई सैनिकांनी गोळीबार केला. याउलट, थाई लष्कराने म्हटले आहे की, कंबोडियाने प्रथम ड्रोनचा वापर केला आणि त्यानंतर तोफ आणि लांब पल्ल्याच्या BM-21 रॉकेटने हल्ला चढवला. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तणाव आणखी वाढतच चालला आहे.

thailand cambodia border war 2025

वाढता तणाव आणि लष्करी तयारी

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थायलंडने सीमेवर एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केली आहेत, जे परिस्थितीची गंभीरता दर्शवते. या वर्षाच्या सुरुवातीला, २८ मे रोजी, दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती, ज्यात एक कंबोडियन सैनिक मारला गेला होता.

तेव्हापासूनच या दोन शेजारी राष्ट्रांमधील वाद धुमसत होता. या सीमावादामुळे राजकीय पातळीवरही परिणाम झाले आहेत; इंडोनेशियाचे पंतप्रधान प्योतोंगटार्न शिनावात्रा यांनाही याच वादामुळे पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

नागरिकांचे स्थलांतर अन् दूतावासाचा इशारा

या संघर्षामुळे सीमेवरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. थायलंडने सीमेवरील ८६ गावांतून सुमारे ४० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. त्याचबरोबर, कंबोडियामध्ये राहणाऱ्या थाई लोकांनाही आपल्या देशात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कंबोडियाची राजधानी नोम पेन्हमधील रॉयल थायलंड दूतावासाने एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की सीमेवरील परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि हा संघर्ष बराच काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, दूतावासाने आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर कंबोडिया सोडण्यास सांगितले आहे.

सीमावादाचा प्रश्न ११८ वर्षांपासूनचा!

थायलंड आणि कंबोडियामधील या सीमा वादाचा इतिहास तब्बल ११८ वर्षांपूर्वीचा आहे. या वादाचे मूळ प्रेह विहार मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराशी जोडलेले आहे.

कंबोडिया फ्रेंच राजवटीखाली असताना, १९०७ मध्ये दोन्ही देशांदरम्यान ८१७ किलोमीटर लांबीची सीमा निश्चित करण्यात आली होती. मात्र, थायलंडने या नकाशाला नेहमीच विरोध केला, कारण यामध्ये प्रेह विहार नावाचे ऐतिहासिक मंदिर कंबोडियाचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते.

याच मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरूच राहिला. १९५९ मध्ये, कंबोडियाने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले. १९६२ मध्ये, न्यायालयाने मंदिर कंबोडियाचे असल्याचा निकाल दिला.

थायलंडने हा निर्णय मान्य केला असला तरी, मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनीवरील वाद अजूनही कायम आहे. हा ऐतिहासिक वादच आता पुन्हा एकदा हिंसक संघर्षाचे कारण बनला आहे, ज्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+