600 पाकिस्तानी कमांडोंची जम्मू काश्मीरात घुसखोरी! पाकिस्तान कारगिलसारख्या युद्धाच्या तयारीत?
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपता संपत नसून त्यातच आता एक मोठा आणि खळबळजनक दावा समोर आला आहे.
पाकिस्तान पुन्हा कारगिल युद्धासारखे युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाकव्याप्त काश्मीरचे कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला आहे. या दाव्यामुळे पुन्हा कारगील युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

काय आहे दावा?
श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. पीओके (पाकव्याप्त काश्मीर) येथील प्रसिद्ध कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी यासाठी थेट पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरले आहे. पाकिस्तान कारगिलसारखे दुसरे युद्ध सुरू करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे शेकडो सैनिक भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अयुब मिर्झा यांनी 28 जुलै रोजी एक्सवर पोस्ट करून अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
'ते' हल्ले अतिरेक्यांनी नव्हे पाकिस्तानी लष्कराचे
अय्युब मिर्झा म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात जे हल्ले झाले आहेत ते दहशतवाद्यांनी नाही तर पाकिस्तानी लष्कराने केले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या SSG चे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) मेजर जनरल आदिल रहमानी यांनी जम्मू भागात हे हल्ले केले आहेत.
1. Allegedly SSG General Officer Commanding (GOC) Maj General Adil Rehmani is conducting the attacks in Jammu region.
2. one whole SSG battalion is said to have infiltrated that means at least 600 commandos are in Kupwara region and else where.
3. local jihadi sleeper cells… pic.twitter.com/ZI1yz63GdP
— Amjad Ayub Mirza (@AMirza86155555) July 27, 2024
1. Allegedly SSG General Officer Commanding (GOC) Maj General Adil Rehmani is conducting the attacks in Jammu region.
2. one whole SSG battalion is said to have infiltrated that means at least 600 commandos are in Kupwara region and else where.
3. local jihadi sleeper cells… pic.twitter.com/ZI1yz63GdP
600 पाकिस्तानी कमांडोंची घुसखोरी
एसएसजीच्या संपूर्ण बटालियनने भारतात घुसखोरी केल्याचा दावा मिर्झा यांनी केला. त्यात किमान 600 पाकिस्तानी कमांडो असू शकतात. ते कुपवाडा परिसरात आणि इतर ठिकाणी लपलेले आहेत. पीर पंजाल आणि शामबारी पर्वतांमध्ये असलेल्या कुपवाडा प्रदेशात दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्यासाठी लपण्याचे एक उत्तम ठिकाण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्लीपरसेलची पाकिस्तानी सैनिकांना मदत?
दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेलचे दहशतवादी पाकिस्तानी सैनिकांना मदत करत आहेत. त्यांना भारतीय हद्दीत प्रवास करण्यास मदत करणे, पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जंजुआ जम्मूमधील हल्ल्यांचे नेतृत्व करत असल्याचे बोलले जात आहे. भारतीय लष्कराच्या 15 व्या कॉर्प्सचा सामना करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
..तर कारगीलसारखे युद्ध सुरु होऊ शकते
अयुब मिर्झा यांनी सांगितले की, एसएसजीच्या आणखी दोन बटालियन मुझफ्फराबाद, पीओकेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही बटालियनमध्ये 500-500 पाकिस्तानी सैनिक आहेत. जर त्यांनी घुसखोरी केली, तर स्थानिक जिहाद्यांच्या मदतीने पीर पंजाल डोंगरावर कारगिलसारखे युद्ध सुरू होऊ शकते.
पाकिस्तानने युद्ध सुरू केले- माजी डीजीपी, जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी आणि सीआयपीएसएचे माजी सचिव शेष पॉल वैद यांनीही जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यांना पाकिस्तानी लष्कर जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एक्सवर व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांत तुम्ही जम्मू भागात अधिक हल्ले पाहत आहात. कुपवाडा येथील परिस्थिती चिघळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे पाकिस्तानचे एसएसजी जीओसी आदिल रहमानी आहेत.
Reportedly, Pakistan's top army commanders are behind the recent attacks in Jammu region. It is no surprise the precision with which these attacks are taking place. It is an act of war and India needs to respond accordingly. Ab Nahi Sahega Hindustan. pic.twitter.com/ErxP8S9g32
— Shesh Paul Vaid (@spvaid) July 29, 2024
या कामासाठी एसएसजीचे 600 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. त्यातील अनेकजण भारतीय हद्दीकडे आले आहेत. "काही आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत."
ही युद्धाची कृती वाटते..
ते म्हणाले, "मला वाटते की ही युद्धाची कृती आहे. त्यांचा (पाकिस्तानी लष्कराचा) प्रयत्न या युद्धात 16 कॉर्प्स आणि 15 कॉर्प्सला पूर्णपणे सहभागी करून घेण्याचा आहे. त्यांच्यापैकी एक लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जंजुआ आहे. रिपोर्ट्सनुसार, तो आत आला. संपूर्ण ऑपरेशनचे निर्देश त्याने पाकिस्तानमध्ये आणखी दोन बटालियन्स ठेवल्या आहेत असेही ते म्हणाले.
कारगील युद्ध कधी झाले?
कारगिल युद्ध मे ते जुलै 1999 मध्ये झाले. कारगिलमध्ये सुमारे 5 हजार पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. विशेषतः पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला होता. 62 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात 527 भारतीय जवान शहीद झाले होते.
-
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी; 'मशहद'मध्ये दफनविधी, कोण कोण होणार सामील? -
हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन -
इराणच्या शक्तिशाली घराण्यातील गुप्त संघर्ष: मोजतबा खामेनींचे वैयक्तिक आयुष्य अन् सर्वोच्च नेतेपदाची -
Stocks To Buy : 2026 मध्ये 'हे' 5 शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल! पाहा CLSA ने दिलेली टार्गेट प्राईज -
वानखेडेवर टीम इंडियाचा धमाका! इंग्लंडचा पराभव करत भारत चौथ्यांदा T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
Maharashtra Rajya Sabha Elections : शरद पवारांच्या एन्ट्रीने 7 जागा बिनविरोध होणार? जाणून घ्या गणित -
International Women's Day : 8 मार्चलाच का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? जाणून घ्या रंजक इतिहास -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग!







Click it and Unblock the Notifications