ते बेट पुन्हा मिळणार का ? पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा भारतासाठी आहे महत्वाचा
PM Modi Sri Lanka Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्यानंतर लगेचच श्रीलंकेच्या दौ-यावर आहेत. श्रीलंका दौऱ्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माझा श्रीलंका दौरा 4 ते 6 तारखेपर्यंत असेल.
राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या यशस्वी भारत भेटीनंतर ही भेट होत आहे. आम्ही बहुआयामी भारत-श्रीलंका मैत्रीचा आढावा घेऊ आणि सहकार्याच्या नवीन संधींवर चर्चा करू. श्रीलंकेत होणाऱ्या विविध बैठकांची मी देखील वाट पाहत आहे," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कच्छतीवू बेटावर चर्चा होण्याची शक्यता
पंतप्रधान मोदींच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान कच्चाथीवू बेटावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बेटावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. हे बेट पूर्वी भारताच्या ताब्यात होते, परंतु भारत सरकारने कधीही अधिकृतपणे त्यावर राज्य केले नाही. 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते श्रीलंकेला भेट दिले होते. दरम्यान श्रीलंकेकडून हे बेट परत घेण्यासाठी तामिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्यातील बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
निवडणुकीनंतर पंतप्रधानांच्या पहिल्या भेटीपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिनने त्यांना कच्चाथीवू बेटाच्या प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. त्यांनी श्रीलंकेच्या समकक्षांसमोर या बेटाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. 50 वर्षांपूर्वी 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते श्रीलंकेला भेट दिले होते. तेव्हापासून हे बेट भारत आणि श्रीलंकेतील वादाचा विषय राहिला आहे.
मच्छिमारांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम
एम.के. स्टॅलिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कच्चाथीवू बेट भारताने 1974 मध्ये श्रीलंकेला सोपवले होते. तेव्हापासून तामिळनाडूतील मच्छिमारांना सतत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. श्रीलंकेचे नौदल अनेकदा भारतीय मच्छिमारांना अटक करते आणि त्यांच्या बोटी जप्त करते, ज्यामुळे मच्छिमारांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होतो.
दरम्यान मच्छिमारांना सुरक्षितपणे त्यांची उपजीविका करण्याची संधी मिळावी म्हणून भारत सरकारने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणीही द्रमुकने केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे या उद्देशाने होत आहे, परंतु द्रमुकच्या या आवाहनामुळे कच्चाथीवू मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.












Click it and Unblock the Notifications