जपानी टेक्नाॅलाॅजी भारताचे टॅलेंट! पीएम मोदींचे जपानमध्ये मोठे विधान! काय म्हणाले वाचा 5 मुद्यात
PM Modi's Japan visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे भारत-जपान आर्थिक मंचाला संबोधित करताना भारत आणि जपानमधील आर्थिक सहकार्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले. भारताने एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक आणि स्पेसमध्ये धाडसी आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम आहेत. जपानची तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा शोधून काढणारी हे शतक तंत्रज्ञान क्रांती करू शकते. असे त्यांनी म्हटले आहे. या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

1. जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभेचे संयोजन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान तंत्रज्ञानाचे महासत्ता आहे आणि भारत प्रतिभेचे महासत्ता आहे. या दोन्हींचे संयोजन या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करू शकते.
2. भारताची महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये
भारताने एआय (AI), सेमीकंडक्टर्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि अंतराळ क्षेत्रात धाडसी आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. संरक्षण आणि अवकाश क्षेत्रांनंतर आता अणुऊर्जा क्षेत्रही खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात येत आहे.
3. जपानची भारतातील गुंतवणूक
जपान नेहमीच भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. जपानी कंपन्यांनी भारतात $40 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ही भागीदारी उत्पादन, ऑटोमोबाइल, सेमीकंडक्टर्स आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांमध्ये परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे.
4. 'मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड'चे आवाहन
पंतप्रधान मोदींनी जपानी कंपन्यांना 'मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड' या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. सुझुकी आणि डेक्कन यांसारख्या कंपन्यांप्रमाणेच इतर कंपन्याही यशस्वी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.
5. भारताची आर्थिक स्थिरता
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, सध्या भारतात राजकीय आणि आर्थिक स्थिरता आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.












Click it and Unblock the Notifications