Fact-Check: पाकसोबत युद्ध करण्यास नकार, भारतीय एअर मार्शलची उचलबांगडी; पाकचा दावा खरा की खोटा?
भारताचे एअर मार्शल सुजीत धारकर यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास नकार दिला. त्यानंतर भारत सरकारने त्यांची या पदावरुन उचलबांगडी केली असा दावा, पाकिस्तानी मीडियाने केला होता. याबाबत पाकिस्तानी सोशल मीडियावर गेल्या काल दिवसभर मॅसेज फिरत राहिले. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन हा मॅसेज व्हायरल करण्यात आला. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काय होता मॅसेज?
भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख सुजीत धारकर यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास नकार दिल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला होता. त्याचबरोबर त्यांनी युद्धास नकार दिल्यानंतर भारताने त्यांची या पदावरुन उचलबांगडी केली, असेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले होते. पाकसमर्थक अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन दोन दिवसांपासून ही पोस्ट चांगलीच व्हायरल करण्यात आली होती.
खरं काय आहे?
प्रेस इन्फाॅर्मेशन ब्युरीच्या फॅक्ट चेक युनिटने या प्रकरणात लक्ष घातले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्टबाबत पीआयबीने खुलासा केला. त्यात म्हटले आहे की, एअर मार्शल धारकर हे उपप्रमुख म्हणून ३० एप्रिलला निवृत्त झाले. त्यांनी हवाई दलात ४० वर्षे सेवा केली. निवृत्तीच्या दिवशी एअर मार्शल धारकर यांना वायु भवन येथील हवाई मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे पाकिस्तानी मीडियात करण्यात आलेला हा दावा सपशेल खोटा आहे, असे पीआयबीने स्पष्ट केले.
Several pro-Pakistan social media accounts have falsely claimed that Air Marshal Sujeet Pushpakar Dharkar, Vice Chief of the Air Staff, has been sacked for refusing to fight a war against Pakistan #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 1, 2025
❌The claims being made in these posts are #fake
✅ Air Marshal… pic.twitter.com/ydBZOJIv9r
भारत-पाक तणाव वाढला
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. सिंधू जल करार रद्द करत सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहिम हाती घेत त्यांना पाकिस्तानाच परत पाठवविले आहे. पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी भारताने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. याशिवाय अटारी-वाघा बाँर्डरही बंद करण्यात आली आहे. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही सिमला करार रद्द केला आहे. सरकारने गुरुवारी अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याची मुभा शिथिल केली. परंतु अद्याप पाकिस्तानने भारतीयांसाठी अशी अट शिथिल केलेली नाही.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications