Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहलगाम हल्ला, भारताचा इशारा मिळताच पाकिस्तानचे चिथावणीखोर पाऊल, मिसाईल चाचणीचा घेतला निर्णय

Pakistan Missile Test : जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आणखी एक चिथावणीखोर वागणूक पाहायला मिळत आहे.

पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेले हत्याकांड अद्याप विसरलेही नाही, अवघे दोन दिवसच या घटनेला झाले असताना पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने याबाबत एक अधिसूचना देखील जाहीर केली.

पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. भारताने केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या हालचालीवर भारतीय यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.

Pakistan missile test

क्षेपणास्त्र चाचणीसाठी अधिसूचना जारी

वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण दलातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'पाकिस्तानने 24-25 एप्रिल रोजी त्यांच्या स्पेश इकॉनॉमी क्षेत्रातील कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमीनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. या सर्व घडामोडींवर आता भारतीय यंत्रणांचे लक्ष असणार आहे.

भारताचे कठोर पाऊल

दरम्यान, भारताने एक कठोर पाऊल उचलले आहे. सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला. पहलगाम घटनेनंतर भारताने केलेल्या कृती बेजबाबदार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी 1960 चा सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडण्यासाठी पाऊल उचलले.

क्षेपणास्त्राची मारा क्षमता 480 किमी लांब

पाकिस्तान ज्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे त्याची मारक क्षमता 480 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. यासाठी पाकिस्तानने अरबी समुद्र प्रदेशाला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केले आहे.

पाकिस्तान 24 ते 25 एप्रिल दरम्यान या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊ शकते. यासाठी शेजारच्या देशाने थेट गोळीबाराचा इशारा दिला आहे. खलाशांनाही या भागापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सीसीएस बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय, पाक येणार अडचणीत

पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर, बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली. सीसीएसने अटारी येथील चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली आहे. भूतकाळात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले असे कोणतेही व्हिसा रद्द केले गेले आहेत असे मानले जाईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+