भारताने खेळला नवा 'डाव', झेलमला सोडले पाणी? गावेची गावे पाण्याखाली गेल्याने पाकिस्तानात आणीबाणी
जम्मू काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साडेसाती सुरु झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आज अचानक पाकिस्तानचा 'आटा गिला' झाला. आज शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्तीन बाला भागात झेलम नदीला पूर आला. हा पूर एवढा मोठा होता की, मुझफ्फराबाद प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर करावी लागली. नदीकाठच्या लोकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मशिदीतून पुराबाबत अपडेट द्यावे लागले. हे पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता भारताने सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला.

झेलमला अचानक पूर
उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातील चकोठी येथे पाणी शिरल्याने झेलम नदीला आज अचानक मोठा पूर आला. ही नदी पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमधून वाहत असल्याने तेथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिकांमध्ये धावपळ उडाली. सगळीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली. मशिदींमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
पाणीपातळी ७ ते ८ फुटांनी वाढली
पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की, झेलम नदीचे पाणी भारतातील अनंतनाग येथून आत शिरले. ते चाकोठी परिसरातून वाहत होते. चाकोठीमध्ये पाण्याच्या प्रवाहात अचानक असामान्य वाढ दिसून आली. ज्यामुळे नदीकाठच्या गावांमधील लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली. झेलम नदीची पाण्याची पातळी सामान्यपेक्षा ७-८ फूट जास्त झाली आहे. लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतावर केला आरोप
मुझफ्फराबादचे उपायुक्त मुदस्सर फारूख म्हणाले की, झेलम नदीला कमी पातळीने पूर आला आहे आणि त्यातून २२,००० क्युसेक पाणी वाहत आहे. त्याच वेळी, पाकिस्तानच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) म्हटले आहे की, अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पाणी मंगला धरणापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. खाली प्रवाहात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे की, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी भारताने इशारा द्यायला हवा होता, असेही पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे.
भारताचे म्हणणे काय?
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स रिव्हर्स अँड पीपल (एसएएनडीआरपी) चे हिमांशू ठक्कर म्हणाले की, खरी समस्या पश्चिमेकडील नद्यांशी संबंधित आहे. जिथे पायाभूत सुविधांच्या मर्यादा आपल्याला पाण्याचा प्रवाह त्वरित थांबवण्यापासून रोखतात. चिनाब खोऱ्यात आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, जे पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील. तोपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे पाणी पाकिस्तानकडे वाहत राहील. एकदा हे कार्यान्वित झाले की, भारतात एक नियंत्रण यंत्रणा असेल जी सध्या अस्तित्वात नाही. पर्यावरण कार्यकर्ते आणि मंथन स्टडी सेंटरचे संस्थापक श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले की, भारत पाण्याचा प्रवाह लवकर वळवू शकतो. सध्या, पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका







Click it and Unblock the Notifications