World Population Day : 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या इतकी होणार, लोकसंख्येत महाराष्ट्राचा कितवा नंबर
World Population Day 2025 : दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो, आणि दर दहा वर्षांनी लोकसंख्येचे मोजमाप केले जाते. २०११ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना लोकसंख्येची गणना करण्यात आली होती. त्यावेळी १२१ कोटींच्या घरात असलेला देशाची लोकसंख्या २०२७ या वर्षात मोजली जाणार आहे.

नियमाप्रमाणे २०२१ मध्ये लोकसंख्येची गणना करणे क्रमप्राप्त होते, परंतु त्या काळात कोरोनाचा संसर्ग एवढ्या शिखरावर होता की, घराबाहेर पडणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे लोकसंख्या गणना झाली नव्हती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्वातील एनडीए सरकारने १ मार्च २०२७ पासून लोकसंख्येची मोजली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता या काळापर्यंत भारताची लोकसंख्या किती होणार ही माहिती जाणून घेऊया.
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात सध्या कितवा क्रमांक आहे
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत हा आहे. भारताच्या पुढे चीन आहे ज्याची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे.
२०२७ मध्ये किती असेल भारताची लोकसंख्या
भारतात एक मार्च २०२७ पासून लोकसंख्या गणना केली जात आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, या कालावधीपर्यंत भारताची लोकसंख्या १४८ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आता भारताची लोकसंख्या १४१ कोटी असल्याचे म्हटले जाते.
२०३० पर्यंत किती असेल भारताची लोकसंख्या?
इंडिया टीव्हीने संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आपल्या वृत्तात दिला त्यानुसार, २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या १.५ अब्ज होईल असे म्हटले आहे. म्हणजेच जवळपास १५१ कोटी लोक भारतात असतील, ज्यामुळे तो जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत बनण्याची शक्यता आहे. भारत १.३ अब्जाहून अधिक लोकसंख्येचे घर आहे. भारताची लोकसंख्या सध्या बलस्थान असल्याचे मानले जाते, येथे तरुण लोकसंख्या जास्त असल्याचे मिडिया रपोर्ट्स सांगतात.
कोणते राज्यात सर्वाधिक लोकसंख्या
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्य हे देशातील असे राज्य आहे, जिथे सर्वात जास्त लोकसंख्या आहे. अलिकडच्या अंदाजानुसार, अंदाजे २३० दशलक्ष लोकसंख्येसह, उत्तर प्रदेश जगभरातील अनेक राष्ट्रांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहे.
सन २०११ मध्ये भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारताची २०११ मध्ये १ अब्ज २१ कोटी ८५ लाख ४ हजार ९७७ एवढी लोकसंख्या होती असे विकिपीडियावर नमूद आहे.
२०११ नुसार, महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती
सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२ होती. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ९.२८% आहे. लोकसंख्येनुसार, महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींवर असल्याचे बोलले जाते.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम









Click it and Unblock the Notifications