Murshidabad violence:वक्फ कायद्याविरुद्ध हिंसक निदर्शने, मुर्शिदाबादेत हिंदूंवर हल्ला, ममता गप्प का?
West Bengal murshidabad violence : वक्फ मालमत्तेचे शोषण रोखण्यासाठी मंजूर केलेल्या कायद्याने देशाच्या काही भागात विकसित होत असलेल्या कट्टरतावादी मानसिकतेचा पर्दाफाश केला आहे. धार्मिक मालमत्तेत पारदर्शकता आणण्यासाठी भाजपने एक धाडसी पाऊल म्हणून सादर केलेल्या वक्फ दुरुस्ती कायदा 2025 विरोधात देशभरातील कट्टरपंथी गटांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारच्या धार्मिक प्रार्थनेनंतर उसळलेल्या दंगलीत हिंदू कुटुंबांना लक्ष्य करण्यात आले, दुकाने लुटली गेली आणि लोकांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले. दगडफेक, जाळपोळ करत आणि हिंदूंना उघड धमक्या देण्यात आल्या. आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, परंतु परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये हिंदूंविरोधात द्वेषाची भाषा
सोशल मीडियावर हिंसाचारग्रस्त भागातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। "आम्ही सत्तेत आल्यावर त्यांचा हिशोब घेऊ." असे एक व्यक्ती (ज्याचा चेहरा उघडा आहे) बोलताना ऐकू येत आहे.
Videos which shows the situation in Kolkata today:#WaqfBill protestors blocked roads and swirled "Palestinian flag" on hijacked buses: pic.twitter.com/cFZ5hUDWGq
— @jxh45 (@jxh45) April 10, 2025
Over a thousand families have fled their homes in Murshidabad and taken shelter in nearby districts. Last week, I covered the Mothabari riot, and now this.
— Dr. Archana Majumdar (@DrArchanaWB) April 13, 2025
This video is proof of what women and children are enduring in West Bengal due to the Waqf Bill protests—fueled by… pic.twitter.com/JdfJOUa9Sn
टीएमसीचे मौन, भाजपचा हल्लाबोल
या घटनेच्या पार्श्वभुमीवर टिएमसीने मौन बाळगल्यानंतर भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी, सुकांता मजुमदार, दिलीप घोष आणि न्यायाधीश-खासदार अभिजित गंगोपाध्याय यांनी टीएमसी नेत्यांवर निशाणा साधला. हिंदूंवर घरं सोडून जाण्याची वेळ टीएमसीमुळे आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, या हिंसाचारामुळे प्रार्थनास्थळांची विटंबना झाली, लोकांना पलायन करावे लागले आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. "हिंदूंना सुरक्षा का दिली नाही? अशा कृत्यांना परवानगी कोणी दिली?", असा सवाल करत भाजपने राज्य सरकारच्या मौनावर आणि निष्क्रियतेवर सवाल केला.
VIDEO | Kolkata: Aliah University students hold protest over Waqf (Amendment) Act.
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/c1FI7VeQwd
देशभरात हिंसक निदर्शने
मुर्शिदाबादमध्ये सर्वात वाईट हिंसाचार पाहिला गेला, तर मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पाटणा, सिलचर, लखन आणि तमिळनाडूमधील होसूर सारख्या शहरांमध्येही निदर्शने झाली. हैदराबादमधील आंदोलकांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे कायदा रद्द करण्याची मागणी केली. आसामच्या सिलचरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले, पोलिस आणि जमावामध्ये चकमक झाली, 400 हून अधिक लोक सामील असल्याची माहिती आहे. दिल्लीच्या जामा मशिदीतील निषेध शांततापूर्ण राहिला, परंतु वक्फ सुधारणेच्या कोणत्याही प्रयत्नांना रस्त्यावर उत्तर दिले जाईल, त्यातून हा संदेश स्पष्ट होता.
'वक्फ बोर्ड कायद्याच्या वर नाही' : भाजपची भूमिका
वक्फ बोर्ड घटनेच्या वर नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. अनेक दशकांपासून वक्फ मालमत्तेचा गैरवापर होत होता आणि त्याचा लाभ गरीब मुस्लिमांना, विशेषत: पसमांडा मुस्लिमांपर्यंत पोहोचत नव्हता. ही दुरुस्ती पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करते आणि मुल्ला-माफियाचे संबंध तोडतात.
विरोधकांचे राजकारण : व्होट बँकेच्या आगीत देश?
काँग्रेस, टीएमसी आणि एमआयएमने या कायद्याला विरोध केला आहे. परंतु कट्टरपंथीय घटकांद्वारे द्वेषाची भाषणं आणि हिंसेचा उघडपणे निषेध न करणे यातून विरोधकांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर लांगुलचालनाचे राजकारण केल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मोबदल्यात व्होट बँकेचा खेळ केल्याचा आरोप केला.
भाजप नेते तरुण चुघ यांनी ममता बॅनर्जी यांना "आधुनिक काळातील जिना" संबोधले आणि त्यांच्यावर हिंदूंच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हिंसाचाराचे वर्णन "राज्य पुरस्कृत" म्हणून केले आणि मंदिरांची तोडफोड, जबरदस्तीने स्थलांतर आणि जाळपोळ केल्याचा आरोप टीएमसीवर केला.
कायदा मागे घेणार नाही : सरकारचा संदेश स्पष्ट
प्रचंड दबाव असतानाही मोदी सरकार मागे हटायला तयार नाही. केंद्राने कायदा रद्द करण्यास नकार दिला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि धार्मिक भ्रष्टाचार साफ करण्यावर विशेषत: ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष अपयशी ठरला आहे तिथे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.
मुस्लिम समाजाला कायद्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने भाजपने 20 एप्रिल ते 5 मे या कालावधीत 'वक्फ सुधारणा जागृती अभियान' सुरू केले आहे. कितीही विरोध झाला तरी भाजप मागे हटत नाही. हा कायदा गरीब मुस्लिम आणि सर्व नागरिकांच्या हिताचा असून, आता कोणतीही धार्मिक संस्था राज्यघटनेच्या वर असू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
-
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
"अदानी पोर्ट्सची जागतिक भरारी; श्रीलंकेतील बंदरातून 10 लाख कंटेनरची विक्रमी वाहतूक" -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
मुंबईकरांनो पाणी भरून ठेवा! 24 तासांचा 'मेगा वॉटर कट'; 50 हून अधिक भागांत पाणीपुरवठा ठप्प, वाचा यादी -
IPL 2026 csk schedule वेळापत्रक जाहीर; संजू सॅमसन चेन्नईत सामील, पाहा संपूर्ण शेड्युल! -
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध?







Click it and Unblock the Notifications