Wayanad By-Election : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांचा विजय, भाजपच्या नव्या हरिदास यांचा पराभव
Wayanad By-Election 2024 : केरळमधील वायनाडमध्ये आज 23 नोव्हेंबर (शनिवार) रोजी मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये प्रियंका गांधी या विजय पताका घेऊन पुढे निघाल्या आहेत. भाजपच्या नव्या हरिदास या पराभवाच्या गर्तेत आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघातून 3.65 लाख मतांनी विजय मिळवला. आता प्रियांकाने ही लीड कापून नवा विक्रम केला आहे. त्यांच्यानंतर एलडीएफ किंवा सीपीआयचे उमेदवार सत्यन मोकेरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वायनाड लोकसभा पोटनिवडणूक 2024 मध्ये, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा भाजप उमेदवार नवीन हरिदास, डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) उमेदवार सत्यान मोकेरी आणि अन्य 13 विरुद्ध लढत आहेत. प्रियांका गांधी दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय असल्या तरी त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. म्हणजेच विरोधी उमेदवारांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस प्रथमच उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या.
वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक का घ्यावी लागली?
प्रियांकाचा भाऊ राहुल गांधी लोकसभेत केरळच्या वायनाडमधून प्रतिनिधित्व करत आहेत. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमधून जिंकले पण राहुल यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि यूपीच्या रायबरेली यापैकी एक जागा निवडायची होती. राहुल गांधींनी वायनाड सोडण्याचा निर्णय घेतला आणि रायबरेलीची जागा खासदार म्हणून राखली. राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली आहे.
भाजपच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर आहेत.राहुल गांधी यांनीही गेल्या लोकसभा निवडणुकीत यूपीच्या रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाल्याने येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. प्रियांका गांधी अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत, मात्र त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्याकडे काँग्रेसचे सरचिटणीस पद आहे, जरी त्यांच्याकडे औपचारिकपणे पक्षाची कोणतीही थेट जबाबदारी नाही.
प्रियका गांधींनी भुस्खलनानंतर घेतली होती पीडितांची भेट
वायनाडमध्ये भूस्खलन ही सर्वात मोठी समस्या आहे वायनाड पोटनिवडणुकीतील सर्वात मोठी समस्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या भीषण भूस्खलनाची आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही बेघर आणि पीडितांची भेट घेतली होती.
या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमध्ये साडेतीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना केवळ 2,83,023 मते मिळाली. तर भाजपचे के. सुरेंद्रन यांना केवळ 1,41,045 मते मिळाली.
राहुल यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा वायनाडमधून विजय मिळवला होता. वायनाड ही अल्पसंख्याक बहुल लोकसभा जागा आहे, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या अल्पसंख्यांकांमध्ये सर्वाधिक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी येथे पहिल्यांदाच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications