Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपराष्ट्रपती निवडणूक: मतमोजणी सुरु, कोण जिंकणार, सीपी राधाकृष्णन की रेड्डी? थोड्याच वेळात निकाल

Vice President Election Results Update : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज 9 सप्टेंबर 2025, (मंगळवारी मतदान पार पडले. सकाळी दहावाजेपासून सुरु झालेली मतदार प्रक्रीया सायंकाळी पाच वाजता पुर्ण झाली.

राज्यसभेचे 245 आणि लोकसभेचे 543 असे एकूण 788 खासदार या निवडणुकीत मतदाते होते. सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानाची प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षेनेते राहुल गांधी आणि जवळपास सर्व खासदारांनी सहभाग घेतला. मतमोजणीला सायंकाळी पाचनंतर सुरुवात झाली असून भारताला आपला पुढील उपराष्ट्रपती थोड्याच वेळात मिळणार आहे.

Vice President Election Results Update

पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी केले मतदान, चुरशीची लढत

उपराष्ट्रपती पदासाठी आजची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी 'INDIA' आघाडी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी मतदान केले. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात चुरशीची लढत झाली.

एवढ्या खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क

संसद भवनातील रूम नंबर 101 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 788 खासदारांपैकी 7 जागा रिक्त आहेत, म्हणून सध्या 7181 असा एकूण खासदारांचा आकडा आहे, यातील 768 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 13 खासदारांनी मतदान केले नाही. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता मतमोजणी लवकरच सुरू होईल आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह आणि एल मुरुगन यांच्यासोबत सर्वात आधी मतदान केले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसद भवनात आपला मतदानाचा हक्क बजावला.

कुणाची ताकद मोठी, किती जागा आणि संख्याबळ

संसद भवनात एकूण 781 खासदार आहेत (542 लोकसभा आणि 239 राज्यसभा) यामध्ये एनडीए आघाडीला 427 खासदारांचा पाठिंबा असून, विजयासाठी आवश्यक असलेल्या 391 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा हे संख्याबळ खूप जास्त आहे. तर, 'इंडिया' आघाडीकडे 315 खासदार आहेत. बीजू जनता दल (BJD) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांसारख्या काही प्रमुख पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो.

निवडणुकीवर काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मतदानापुर्वी म्हटले की, बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीची मते कायम राहतील आणि ही लढत अधिक लक्षवेधी होईल.

कोण भाजपसोबत, कोण संविधानासोबत - काँग्रेस खासदार

काँग्रेसचे खासदार माणिकम् टागोर यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा सक्तीने घेतल्यासारखा वाटत असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, 'इंडिया' आघाडीने प्रामाणिक आणि तटस्थ म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली, जेणेकरून कोण भाजपसोबत आहे आणि कोण संविधानासोबत आहे, याची परीक्षा घेता येईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+