Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sardar Patel Jayanti Quotes: लोहपुरुष सरदार पटेल यांचे 15 अनमोल विचार; ज्यांनी 562 संस्थानांना जोडले

Sardar Vallabhbhai Patel Jayanti 15 Inspirational Quotes wishes in matathi : आज, ३१ ऑक्टोबर, स्वतंत्र भारताचे पहिले उप-पंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान अमूल्य आहेच; पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, स्वातंत्र्यानंतर ५६२ छोट्या-छोट्या संस्थानांना एकत्र करून अखंड भारताची एकसंघ निर्मिती करण्याचे अतुलनीय आणि ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.

सरदार पटेल यांची बुद्धिमत्ता, अनुभव आणि कणखर नेतृत्वामुळेच भारत एक विशाल राष्ट्र म्हणून उभा राहिला. याच 'लोहपुरुषा'चे प्रेरणादायक विचार आजही लाखो तरुणांना योग्य मार्ग दाखवतात. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या १५ अनमोल विचारांबद्दल.

Sardar Vallabhbhai Patel Jayanti

सरदार पटेल यांचे १५ अनमोल विचार (sardar patel thoughts in marathi)

सरदार पटेल यांचे हे विचार केवळ भारताला जोडणारे नव्हते, तर व्यक्तीच्या जीवनाला नवी दिशा देणारे आहेत.

  • आज आपण उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पंथाचे भेदभाव संपवले पाहिजेत.
  • देशाच्या मातीत या मातीमध्ये काहीतरी वेगळे आहे, जे अनेक अडथळ्यांनंतरही नेहमीच महान आत्म्यांचे निवासस्थान राहिले आहे.
  • शक्तीच्या अभावी विश्वास व्यर्थ आहे. कोणताही महान हेतू साध्य करण्यासाठी विश्वास आणि शक्ती या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
  • माणसाने शांत राहिले पाहिजे, राग (क्रोध) करू नये. लोखंड गरम झाले तरी हातोडा थंडच राहिला पाहिजे, अन्यथा तो स्वतःचा हात जाळून घेईल.
  • तुमचा चांगुलपणा तुमच्या मार्गातील अडथळा आहे, म्हणून तुमच्या डोळ्यांना क्रोधाने लाल होऊ द्या आणि अन्यायाचा सामना मजबूत हातांनी करा.
  • जोपर्यंत मनुष्य अधिकारांसाठी किंमत मोजत नाही, तोपर्यंत अधिकार त्याला आंधळे बनवत राहतील.
  • तुम्हाला स्वतःचा अपमान सहन करण्याची कला अवगत असायला हवी.
  • माझी एकच इच्छा आहे की, भारत एक चांगला उत्पादक देश व्हावा आणि या देशात कोणीही अन्नासाठी अश्रू गाळत उपाशी राहू नये.
  • संस्कृती समजूतदारपणाने शांततेवर रचलेली आहे. जे काम प्रेम आणि शांततेने होते, ते वैरभावाने होत नाही.
  • जो व्यक्ती जीवनाला खूप गंभीरपणे घेतो, त्याला तुच्छ जीवन जगण्याची तयारी ठेवायला लागते. सुख-दुःख समान रीतीने स्वीकारणाराच जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो.
  • मृत्यूची चिंता करू नका, कारण तुमच्या जीवनाची दोर ईश्वराच्या हाती आहे आणि तो नेहमी चांगलेच करतो.
  • जीवनात तुम्ही जेवढेही दुःख आणि सुखाचे भागीदार बनता, त्याचे पूर्णपणे जबाबदार तुम्ही स्वतःच असता. यात ईश्वराचा कोणताही दोष नसतो.
  • जोपर्यंत माणसाच्या आतला 'बाळ' जिवंत आहे, तोपर्यंत निराशा आणि अंधकाराची छाया त्याच्यापासून दूर राहते.
  • जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा भित्रा आणि बहादूर व्यक्तीमधील फरक स्पष्ट होतो, कारण भित्रा तेव्हा बहाणा शोधतो आणि बहादूर व्यक्ती मार्ग शोधतो.
  • जर तुम्ही आंब्याचे फळ वेळेआधीच तोडून खाल्ले, तर ते आंबटच लागेल. पण जर तुम्ही त्याला थोडा वेळ दिला, तर ते स्वतःच पिकून खाली पडेल आणि तुम्हाला अमृतासारखे लागेल.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+