Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Rath Yatra 2025 : जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत सुरक्षा कशी असणार?, सुरक्षेसाठी AIचा कसा वापर होणार?

Jagannath Puri Rath Yatra 2025 : भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच, देशात सर्वात मोठा सण उत्सव सोहळा होत आहे, तो म्हणजे ओडीसामधील पुरी येथील जगन्नाथांची रथयात्रा सोहळा.

या रथयात्रा सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तर या यात्रेत प्रथमच एआयचा वापर करून गर्दी नियंत्रण केली जाणार आहे.

कधी आहे पुरी रथयात्रा, जाणून घ्या महत्त्व?

आजपासून म्हणजेच 27 जून पासून रथयात्रेचा शुभारंभ झाला आहे. त्यानिमित्त, ओडिशातील पुरी येथे होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रथयात्रेत पहिल्यांदाच एनएसजी कमांडो तैनात केले जाणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरी बाब म्हणजे, गर्दी व्यवस्थापनासाठी एआय या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच रथयात्रेत एआयचा वापर केला जात आहे. सीसीटीव्हीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील वापर केला जाईल, ज्याद्वारे कोण कुठे जात आहे किंवा किती गर्दी आहे, याविषयी माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

rath yatra 2025

रथयात्रेसाठी चॅटबॉट तयार!

एक चॅटबॉटची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये पुरी येथे दर्शनासाठी येऊ इच्छिणाऱ्या भाविकांना कोणता मार्ग योग्य आहे, हे पाहता येईल आणि कळेल. त्यात काही अडथळा आहे की नाही.

जर अडथळा असेल तर कोणता मार्ग उपलब्ध आहे. जेव्हा ते पुरी किंवा पुरीजवळ पोहोचतात तेव्हा पार्किंगची सुविधा कुठे आहे? त्यांच्यासाठी जागा आहे की नाही? ते त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतात.

किती पोलिसांचा फोर्स तैनात!

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, 10 हजार पोलिस, एनएसजी, ड्रोन, स्नायपर्स, गर्दी व्यवस्थापनाची काळजी घेण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे, अशा प्रकारे पुरी रथयात्रेची सुरक्षा व्यवस्था असणार आहेत. सर्व गुप्तचर अहवाल लक्षात घेऊन, प्रथमच, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि त्यांचे स्नायपर्स, रॅपिड अॅक्शन फोर्स, सीआरपीएफ रथयात्रेत तैनात केले जाणार आहेत.

महिला आणि मुलांसाठी विशेष व्यवस्था!

या वर्षी रथयात्रेत सुरक्षेसाठी तब्बल 10 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. रथयात्रेत महिला आणि मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि मुलांना सर्व प्रकारची मदत करता यावी यासाठी कमी अंतरावर व्यवस्था करण्यात आली आहे.

का काढली जाते रथयात्रा?

पौराणिक मान्यतेनुसार, एकदा भगवान जगन्नाथांची बहीण सुभद्रा हिने शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अशा परिस्थितीत भगवान जगन्नाथांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला रथावर बसवून शहराची भ्रमंती करायला लावली. या काळात ते त्यांच्या मावशीच्या घरी ७ दिवस राहिले. तेव्हापासून दरवर्षी भगवान जगन्नाथांची रथयात्रा काढली जाते असे मानले जाते.

भगवान जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथ रथयात्रेत सहभागी झाल्याने (जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व) व्यक्तीचे पाप नष्ट होतात. तसेच, रथ ओढल्याने सौभाग्य मिळते. या रथयात्रेत, बलरामजींचा रथ पुढे, बहीण सुभद्रा मध्यभागी आणि भगवान जगन्नाथजींचा रथ मागे फिरतो.

जगन्नाथ रथयात्रेची खासियत

भगवान जगन्नाथांच्या रथाबद्दल एक खास गोष्ट आहे की, रथ बनवण्यासाठी खिळे वापरले जात नाहीत, कारण शास्त्रांनुसार आध्यात्मिक कार्यासाठी खिळे किंवा काटे वापरले जात नाहीत. असे करणे अशुभ मानले जाते. भगवान बलराम आणि देवी सुभद्रा यांचा रथ लाल रंगाचा आहे आणि भगवान जगन्नाथांचा रथ पिवळा किंवा लाल रंगाचा असतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+