Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे संबोधन, म्हणाल्या- तिरंगा फडकताना पाहून उर भरुन येतो

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती म्हणाल्या, 'सर्व देशवासी 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत हे पाहून मला खूप आनंद होत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकवताना पाहून - मग तो लाल किल्ल्यावर असो, राज्यांच्या राजधानीत असो किंवा आपल्या आजूबाजूला असो, हृदय उत्साहाने भरून येते.''

President Draupadi Murmu s address to the nation on the eve of Independence Day

महान स्वातंत्र्यसैनिकांच्या भावनांचे प्रतिध्वनी ऐकतो

78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "15 ऑगस्ट रोजी, देश-विदेशातील सर्व भारतीय ध्वजारोहण समारंभात सहभागी होतात, देशभक्तीपर गीते गातात आणि मिठाईचे वाटप करतात. मुले सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. जेव्हा आपण मुलांना आपल्या महान राष्ट्राबद्दल आणि भारतीय असण्याच्या अभिमानाबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपण त्यांच्या अभिव्यक्तीतून महान स्वातंत्र्यसैनिकांच्या भावनांचे प्रतिध्वनी ऐकतो.

आम्हाला असे वाटते की आम्ही अशा परंपरेचा भाग आहोत जी स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने आणि भावी पिढ्यांच्या आकांक्षा यांना जोडते ज्यांना पुढील वर्षांमध्ये आपले राष्ट्र पुन्हा संपूर्ण गौरव प्राप्त करताना दिसेल."

महान नेत्यांचा सक्रिय सहभाग

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "इतिहासाच्या या शृखंलेतील दुवा असल्याची जाणीव आपल्यात नम्रता निर्माण करते. ही जाणीव आपल्याला त्या दिवसांची आठवण करून देते जेव्हा आपला देश परकीय सत्तेखाली होता. देशभक्ती आणि शौर्याने भरलेल्या देशभक्तांनी अनेक जोखीम पत्करली आणि सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या अथक प्रयत्नांच्या बळावर भारताचा आत्मा शतकानुशतके झोपेतून जागा झाला.

आपल्या विविध परंपरा आणि मूल्ये, जी नेहमीच अंतर-धारा म्हणून अस्तित्वात होती, त्यांना पिढ्यानपिढ्या आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी नवीन अभिव्यक्ती दिली. मार्गदर्शक ताऱ्याप्रमाणेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील विविध परंपरा आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिव्यक्तींना एकत्र केले. तसेच सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांसारखे अनेक महान नेतेही सक्रिय होते.

स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचेही मोठे योगदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "हे एक देशव्यापी आंदोलन होते ज्यात सर्व समुदायांनी सहभाग घेतला होता. आदिवासींमध्ये तिलकमांझी, बिरसा मुंडा, लक्ष्मण नायक आणि फुलो-झानो यांच्यासह अनेक लोक होते, ज्यांच्या बलिदानाचे आता कौतुक केले जात आहे.

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आम्ही आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी त्यांची 150 वी जयंती साजरी करणे हा राष्ट्रीय पुनर्जागरणातील त्यांच्या योगदानाचा अधिक व्यापक सन्मान करण्याचा एक प्रसंग असेल."

महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक विशेष योजना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक विशेष योजनाही राबविल्या आहेत. नारी शक्ती वंदन कायद्याचा उद्देश महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करणे हा आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या सर्वात गंभीर दुष्परिणामांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी मानवी समुदायाकडून सुरू असलेल्या संघर्षात भारताला आघाडीची भूमिका बजावण्याचा अभिमान आहे.मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमच्या जीवनशैलीत छोटे पण प्रभावी बदल करा आणि हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी महत्त्वाचे योगदान द्या.

भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात शेतक-यांचे योगदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'आमच्या अन्नदाता शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा चांगले कृषी उत्पादन सुनिश्चित केले आहे. असे करून त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात आणि आपल्या देशवासियांना अन्न पुरवण्यात अमूल्य योगदान दिले आहे.

भारतीय नागरी संहितेबद्दल केले भाष्य

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'या वर्षी जुलैपासून भारतीय नागरी संहिता लागू करताना आम्ही वसाहती काळातील आणखी एक अवशेष काढून टाकला आहे. नवीन संहितेचा उद्देश केवळ शिक्षा न देता गुन्ह्यातील पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे. हा बदल मी स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून पाहते.

देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. 64 वर्षीय मुर्मू यांनी 2022 मध्ये देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा विक्रमही केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+